शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा नवा डाव; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 08:05 IST

महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : महिलांना आरक्षण देण्यास माझा पाठिंबा आहे. मात्र, त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संसदेत मांडलेल्या विधेयकामध्ये अन्य मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे हे विधेयक अपूर्ण आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. जातनिहाय जनगणना केंद्र सरकारने तत्काळ करावी, अशीही त्यांनी मागणी केली.

ते म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येत मोठा हिस्सा असलेल्या महिलांना आरक्षणाचे फायदे मिळायला हवेत. मात्र या प्रकारच्या तरतुदी मोदी सरकारने सादर केलेल्या विधेयकात दिसत नाहीत. महिला आरक्षण तत्काळ लागू करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा आणखी सात ते आठ वर्षे ताटकळत ठेवण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘भाजप दरवेळी नवा इव्हेन्ट करतो’काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, केंद्रामध्ये ९० सचिव आहेत. त्यातील केवळ तीनजण ओबीसी समुदायातील असून ते देशाच्या अर्थसंकल्पातील केवळ पाच टक्के भाग नियंत्रित करतात. विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली की भाजप एक नवा इव्हेन्ट करून या मुद्द्यापासून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न सुरू करतो.

‘जनतेचे अधिकार काढून घेण्याच्या हालचाली’स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत भारतामध्ये सतत सत्तेचे हस्तांतरण होत राहिले आहे. त्यामुळे भारतीय जनतेला अधिक अधिकार प्राप्त झाले. तर दुसऱ्या बाजूला जनतेचे अधिकार काढून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना थांबविण्यासाठी सध्या संघर्ष सुरू आहे, असेही काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रपतींना निमंत्रण देणे आवश्यक होतेजुन्या संसद भवनातून कामकाज नव्या संसद भवनामध्ये हलविण्यात आले. इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे मोदी सरकारने राष्ट्रपतींना निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. - राहुल गांधी 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा