शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पतीने दाखवला राक्षसी अवतार! अन् आजारी मुलाला वाचवण्यासाठी सुरू झाला 'माऊली'चा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 20:08 IST

आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे.

मिर्झापूर : आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे. या माऊलीने व्याजावर पैसे घेतले, दागिने विकले. मात्र एवढं करूनही उपचारासाठी आणखी पैसे लागतील म्हणून शेवटी तिने घरही गहाण ठेवले. शेवटी या मातेने आपल्या आजारी मुलासाठी आतोनात प्रयत्न करणे सुरूच ठेवले. मात्र, आजारपणाने त्रस्त असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी गंगेत फेकून मारण्याचा प्रयत्न केला. पण, आईने मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे आता तो हळूहळू बरा होत आहे. या आईच्या चेहऱ्यावर हसू परत येत आहे.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील उस्का गावातील सुमन या माऊलीला मुलगा झाला तेव्हा घरात आनंदाला थारा नव्हता. मुलाचे नाव शौर्य असे ठेवण्यात आले. शौर्य यांच्या हसण्या-खेळण्यामुळे त्यांच्या छोट्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शौर्यचा जन्म त्याच्या आई-वडिलांसाठी आशीर्वादच होता. पण लवकरच त्यांचा चार महिन्यांचा मुलगा शौर्य आजारी पडल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पण त्याच्या आईने खचून न जाता 'शौर्य' दाखवले. 

शौर्यच्या आईने सांगितली आपबीती शौर्यची आई सुमन यांनी सांगितले की, शौर्य आजारी पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी जिकडे सांगितले तिथे मुलाला दाखवले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा लोक म्हणाले की, भूतांचा त्रास आहे, त्यामुळे मुलगा आजारी राहतोय आणि औषधही काम करत नाही. त्यामुळेच सुमन यांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला बाजूच्या बाबांकडे नेले. त्यांनी 15 हजार रुपये घेतले, पण मुलाला आराम पडला नाही. त्यानंतर त्यांनी मिर्झापूरपासून बनारसपर्यंत अनेक खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या, पण शौर्य कुठेही बरा झाला नाही. यादरम्यान उपचारासाठी चार लाखांहून अधिक रुपये खर्च झाले. 

शौर्यच्या वडिलांचा राक्षसी अवतार शौर्यच्या आईने सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले की त्याला टीबी झाला आहे. सहा महिने औषध घेतले. पण, आराम मिळत नव्हता. त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी दाखवले असता डॉक्टरांनी सांगितले की, त्याची पचनसंस्था बिघडली आहे, त्याला आता वाचवता येणार नाही. निराश होऊन आम्ही मुलाला घेऊन घरी आलो. तेव्हा कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. दरम्यान, अंगणवाडीतील एक शिक्षिका आली आणि त्यांनी सर्कल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्यास सांगितले. शौर्यबरोबर आम्ही तिथे गेलो. त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांचे कंबरडे मोडले. तो जगणार नाही, गंगेत फेकून घरी परत जा, असे त्यांनी मला सांगितले. यावर मी म्हणाले, जोपर्यंत त्याचा श्वास आहे तोपर्यंत मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. 20 दिवसांनी दाखल झाल्यानंतर शौर्यच्या प्रकृतीत सुधारणा झाली. औषध चालू आहे, आता त्याला आराम मिळत आहे, असे शौर्यच्या आईने अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी