शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, अचानक खाण कोसळल्याने अनेक गावकरी अडकले, पाच जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:04 IST

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे.

नवी दिल्लीछत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. जगदलपूरपासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगाव गावात अचानक खान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 हून अधिक गावकरी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अजून बरेच लोक अडकले आहेत. अडकलेल्या गावकऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे. तर आतापर्यंत दोन गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी अद्याप आणखी काही गावकरी अडकले असल्याचे सांगितले जात आहे. 7 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 5 जण खाणीत अडकण्याची शक्यता आहे. 30 ते 40 मिनिटांत अडकलेल्या सर्व गावकऱ्यांना बाहेर काढले जाईल अशी माहिती आहे. 

मिझोराममध्येही खाण कोसळून 12 जणांचा झाला होता मृत्यू 14 नोव्हेंबर रोजी मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात देखील खान कोसळून दुर्घटना घडली होती. खोदकाम सुरू असताना अनेक मोठे दगड वरून तुटून खाली पडले होते, त्यात 12 मजुरांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला होता. आसाम रायफल्स, बीएसएफ, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ यांच्या पथकांनी बचाव कार्य केले मात्र या अपघातात अडकलेल्या सर्व मजुरांचा मृत्यू झाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यूPoliceपोलिस