शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अनेक प्रकल्प कासवगतीने, अडीच लाख कोटींचा फटका; महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्प रखडलेलेच; रेल्वे प्रकल्पही अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 10:35 IST

रस्त्यांच्या ८३५ प्रकल्पांपैकी २६२ प्रकल्प ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक उशिराने सुरू आहेत.

नवी दिल्ली : देशातील अनेक प्रकल्प घोषणा केल्यानंतर कासवगतीने सुरू आहेत. याचा परिणाम म्हणून आता या योजना पूर्ण करण्यासाठीचा खर्च तब्बल २ लाख ५० हजार कोटी रुपयांनी वाढल्याचे केंद्र सरकारच्या एका अहवालात समोर आले आहे. 

सांख्यिकी मंत्रालयांतर्गत असलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प देखरेख विभागाने (आयपीएमडी) हा अहवाल तयार केला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्गाशी संबंधित २६२ प्रकल्प हे कासवगतीने सुरू आहेत. इतर योजनांपेक्षा रस्ते प्रकल्प सर्वाधिक संथगतीने सुरू असून, महाराष्ट्रातील रस्ते महामार्गांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. यानंतर रेल्वेचे ११५ आणि पेट्रोलियम क्षेत्रातील ८९ प्रकल्प रखडले आहेत.

रस्त्यांच्या ८३५ प्रकल्पांपैकी २६२ प्रकल्प ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक उशिराने सुरू आहेत. याचप्रमाणे रेल्वेच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या १७३ पैकी ११५ प्रकल्पांना उशीर झाला आहे, तर पेट्रोलियमच्या १४० पैकी ८९ प्रकल्प नियोजित वेळेपेक्षा मागे आहेत.

किती खर्च वाढला? 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील ८३५ प्रकल्पांच्या अंमलबजावणीची एकूण मूळ किंमत (जेव्हा मंजूर झाली तेव्हा) ४,९४,३००.४५ कोटी रुपये होती. ती आता ५,२६,४८१.८८ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. खर्चात एकूण ३२,१८१.४३ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ही ६.५ टक्के वाढ आहे. या प्रकल्पांवर सप्टेंबर २०२२ पर्यंत ३,२१,९८०.३३ कोटी रुपये खर्च झाला, जो अंदाजित खर्चाच्या ६१.२ टक्के आहे. १७३ रेल्वे प्रकल्पांसाठी आता ६,२३,००८.९८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ६७.१ टक्क्यांनी रेल्वे प्रकल्पांची किंमत वाढली आहे. १,५६६ प्रकल्पांपैकी ३९३ प्रकल्पांचा खर्च ४,५६,३९१.७३ कोटी रुपये आहे. ते मंजूर खर्चाच्या २१ टक्के अधिक आहे.

टॅग्स :Indiaभारतrailwayरेल्वे