शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

ब्रिटीशकालीन गर्भश्रीमंत जगतशेठ, ईस्ट इंडिया कंपनीला दिले होते कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:22 IST

मुघल बादशहा १७२३ मध्ये त्यांस जगतशेठ अशी पदवी दिली होती. त्यामुळे, संपूर्ण घराणंच जगत शेठ नावाने प्रसिद्ध झालं.

एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. इतिहासाच्या अनेक पानांमध्येही हे वाक्य आपण वाचलं असेल. राजेशाही असलेल्या भारतात राजा महाराजांकडे अमाप सुवर्णसंपत्ती होती. त्यामुळेच, प्राचीन भारत हा समुद्ध आणि संपन्न होता. देशातील या तत्कालीन गर्भश्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे जगतशेठ हे होते. जगतशेठ यांच्याकडे एवढा पैसा होता की, ते देशातीलच नाही, तर भारतात आलेल्या इंग्रजांनीही उधारीवर पैसे देत होते. जगतशेठ यांचे खरे नाव फतेहचंद असे होते. 

मुघल बादशहा १७२३ मध्ये त्यांस जगतशेठ अशी पदवी दिली होती. त्यामुळे, संपूर्ण घराणंच जगत शेठ नावाने प्रसिद्ध झालं. शेठ माणिकचंद यांना या घराण्याचा संस्थापक मानले जात. माणिकचंद हे नवाब मुर्शिद कुली खाँ यांचे केवळ खजीनदार नव्हते, तर विभागातील शेतसाराही त्यांच्याकडे जमा होत होता. या दोघांनी मिळून बंगालची नवीन राजधानी मुर्शिदाबाद निर्माण केली. यांनी औरंगजेबाला एक कोटी ३० लाखांऐवजी २ कोटी रुपये लगान म्हणजे कर पाठवला होता.

माणिकचंद यांच्यानंतर फतेहचंदकडे कुटुंबाची जबाबदारी देण्यात आली होती. फतेहचंदच्या काळात त्यांचे कुटुंब एका विशिष्ट उंचीवर होते. सोने किंवा चांदीची भींत बांधून ते गंगा नदीचा प्रवाहही ते थांबवू शकतील, असं त्यांच्या कुटुंबाबद्दल तेव्हा बोललं जायचं. फतेहचंदच्या काळातच त्यांनी सर्वाधिक सोने-नाणे संपत्ती जमा केली. फतेहचंद यांच्या काळात या घराण्याची एकूण संपत्ती १००० बिलियन्स पाऊंड एवढी होती. १७२० च्या काळात जगतशेठच्या या एकूण संपत्तीपेक्षा इंग्रजांची अर्थव्यवस्थाही कमी होती. ब्रिटीश कागदपत्रांच्या दाखल्यानुसार जगतशेठ यांच्याकडे इंग्रजांच्या सर्वच बँकांपेक्षा अधिक संपत्ती होती. 

जगतशेठ यांनी इंग्रजांना मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ केलं होतं. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीकडे जगतशेठचं काहीही कर्ज नाही, असा दावा इंग्रजांनी केला. इंग्रजांनी जगतशेठला धोका दिला. मात्र, १९१२ पर्यंत इंग्रजांकडून जगतशेठ यांच्या कुटुंबीयांना जगतशेठ या उपाधीसह काही रक्कम पेन्शनस्वरुपात देण्यात येत होती. मात्र, कालानंतर ही पेन्शनही बंद करण्यात आली.  

टॅग्स :Indiaभारतbusinessव्यवसायEnglandइंग्लंडMONEYपैसा