शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 05:42 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आणि भारतीयांच्या स्वप्नपूर्तीसह 'विकसित भारत' अभियानाला बळ देणारा असल्याची प्रशंसा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. यातून विकास, गुंतवणूक आणि क्रयशक्ती अनेक पटीने वाढेल, प्रत्येकाच्या खिशात पैसा खुळखुळेल, असे ते म्हणाले.

आज भारत 'विकास आणि वारसा' या मंत्रावर वाटचाल करीत असल्याचे सांगून यासाठी अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा हा अर्थसंकल्प असल्याचे मोदी म्हणाले. पांडुलिपींच्या एक कोटी हस्तलिखित संवर्धनासाठी 'ज्ञान भारत मिशन'च्या तरतुदीचा मोदी यांनी खास उल्लेख केला. आण्विक ऊर्जा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

'वही-खाता' पद्धतीच्या पिशवीत अर्थसंकल्पाचा टॅबलेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६चा अर्थसंकल्प टॅबलेटच्या माध्यमातून सादर केला. हा टॅबलेट त्यांनी पारंपरिक 'वही-खाता' शैलीच्या लाल पिशवीत ठेवला होता. 

अर्थसंकल्पाची कागदपत्रे सुटकेसमधून घेऊन येण्याचे सीतारामन यांनी २०१९च्या जुलैपासून बंद केले. कोरोना काळात त्यांनी टॅबलेटचा वापर करून अर्थसंकल्पीय भाषण केले होते. 

मात्र, शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेटायला जाण्याआधी सीतारामन यांनी अर्थसंकल्प असलेली ब्रिफकेस हातात घेतलेली छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी टिपली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याआधीची ही एक परंपरा आहे.

राष्ट्रपतींनी दिली दहीसाखर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर

करण्यापूर्वी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती मुर्मु यांनी सीतारामन यांचे दहीसाखर देऊन स्वागत केले. मुर्भु यांनी त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

गुरजादा अप्पाराव यांचे स्मरण

गुरजादा अप्पाराव या प्रसिद्ध तेलुगू लेखकाच्या 'देशामंते मत्ती काडोयी, देशामंते मनुधुलोयी' (देश म्हणजे फक्त जमीन नाही, तर तेथे राहणारे लोक आहेत) या प्रसिद्ध वाक्याचा निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख केला.

विरोधकांचा सभात्याग

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर निवेदनाची मागणी करत सुमारे पाच मिनिटे घोषणा दिल्या व त्यानंतर सभात्याग केला. त्यानंतर काही मिनिटांनी हे खासदार पुन्हा सभागृहात आले.

मोदींनी केले भाषणाचे कौतुक

अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी सीतारामन यांनीही त्यांना नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024