शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 05:42 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आणि भारतीयांच्या स्वप्नपूर्तीसह 'विकसित भारत' अभियानाला बळ देणारा असल्याची प्रशंसा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. यातून विकास, गुंतवणूक आणि क्रयशक्ती अनेक पटीने वाढेल, प्रत्येकाच्या खिशात पैसा खुळखुळेल, असे ते म्हणाले.

आज भारत 'विकास आणि वारसा' या मंत्रावर वाटचाल करीत असल्याचे सांगून यासाठी अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा हा अर्थसंकल्प असल्याचे मोदी म्हणाले. पांडुलिपींच्या एक कोटी हस्तलिखित संवर्धनासाठी 'ज्ञान भारत मिशन'च्या तरतुदीचा मोदी यांनी खास उल्लेख केला. आण्विक ऊर्जा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

'वही-खाता' पद्धतीच्या पिशवीत अर्थसंकल्पाचा टॅबलेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६चा अर्थसंकल्प टॅबलेटच्या माध्यमातून सादर केला. हा टॅबलेट त्यांनी पारंपरिक 'वही-खाता' शैलीच्या लाल पिशवीत ठेवला होता. 

अर्थसंकल्पाची कागदपत्रे सुटकेसमधून घेऊन येण्याचे सीतारामन यांनी २०१९च्या जुलैपासून बंद केले. कोरोना काळात त्यांनी टॅबलेटचा वापर करून अर्थसंकल्पीय भाषण केले होते. 

मात्र, शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेटायला जाण्याआधी सीतारामन यांनी अर्थसंकल्प असलेली ब्रिफकेस हातात घेतलेली छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी टिपली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याआधीची ही एक परंपरा आहे.

राष्ट्रपतींनी दिली दहीसाखर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर

करण्यापूर्वी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती मुर्मु यांनी सीतारामन यांचे दहीसाखर देऊन स्वागत केले. मुर्भु यांनी त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

गुरजादा अप्पाराव यांचे स्मरण

गुरजादा अप्पाराव या प्रसिद्ध तेलुगू लेखकाच्या 'देशामंते मत्ती काडोयी, देशामंते मनुधुलोयी' (देश म्हणजे फक्त जमीन नाही, तर तेथे राहणारे लोक आहेत) या प्रसिद्ध वाक्याचा निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख केला.

विरोधकांचा सभात्याग

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर निवेदनाची मागणी करत सुमारे पाच मिनिटे घोषणा दिल्या व त्यानंतर सभात्याग केला. त्यानंतर काही मिनिटांनी हे खासदार पुन्हा सभागृहात आले.

मोदींनी केले भाषणाचे कौतुक

अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी सीतारामन यांनीही त्यांना नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024