शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 05:42 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आणि भारतीयांच्या स्वप्नपूर्तीसह 'विकसित भारत' अभियानाला बळ देणारा असल्याची प्रशंसा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. यातून विकास, गुंतवणूक आणि क्रयशक्ती अनेक पटीने वाढेल, प्रत्येकाच्या खिशात पैसा खुळखुळेल, असे ते म्हणाले.

आज भारत 'विकास आणि वारसा' या मंत्रावर वाटचाल करीत असल्याचे सांगून यासाठी अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली असल्याचे मोदी यांनी नमूद केले. १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा हा अर्थसंकल्प असल्याचे मोदी म्हणाले. पांडुलिपींच्या एक कोटी हस्तलिखित संवर्धनासाठी 'ज्ञान भारत मिशन'च्या तरतुदीचा मोदी यांनी खास उल्लेख केला. आण्विक ऊर्जा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आपला आठवा अर्थसंकल्प सादर केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे.

'वही-खाता' पद्धतीच्या पिशवीत अर्थसंकल्पाचा टॅबलेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६चा अर्थसंकल्प टॅबलेटच्या माध्यमातून सादर केला. हा टॅबलेट त्यांनी पारंपरिक 'वही-खाता' शैलीच्या लाल पिशवीत ठेवला होता. 

अर्थसंकल्पाची कागदपत्रे सुटकेसमधून घेऊन येण्याचे सीतारामन यांनी २०१९च्या जुलैपासून बंद केले. कोरोना काळात त्यांनी टॅबलेटचा वापर करून अर्थसंकल्पीय भाषण केले होते. 

मात्र, शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेटायला जाण्याआधी सीतारामन यांनी अर्थसंकल्प असलेली ब्रिफकेस हातात घेतलेली छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी टिपली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर होण्याआधीची ही एक परंपरा आहे.

राष्ट्रपतींनी दिली दहीसाखर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर

करण्यापूर्वी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपती मुर्मु यांनी सीतारामन यांचे दहीसाखर देऊन स्वागत केले. मुर्भु यांनी त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

गुरजादा अप्पाराव यांचे स्मरण

गुरजादा अप्पाराव या प्रसिद्ध तेलुगू लेखकाच्या 'देशामंते मत्ती काडोयी, देशामंते मनुधुलोयी' (देश म्हणजे फक्त जमीन नाही, तर तेथे राहणारे लोक आहेत) या प्रसिद्ध वाक्याचा निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख केला.

विरोधकांचा सभात्याग

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर निवेदनाची मागणी करत सुमारे पाच मिनिटे घोषणा दिल्या व त्यानंतर सभात्याग केला. त्यानंतर काही मिनिटांनी हे खासदार पुन्हा सभागृहात आले.

मोदींनी केले भाषणाचे कौतुक

अर्थसंकल्प मांडल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी सीतारामन यांनीही त्यांना नमस्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024