शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:36 IST

Uttar Pradesh News: मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे.

मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. छोट्याशा घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही अशी मोजकीच विजेवर चालणारी उपकरणं असताना या तरुणाच्या घरचं विजेचं बिल एक लाख रुपयांच्या वर आलं होतं. पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा या तरुणाच्या घरचं विजबिल अव्वाच्या सव्वा आलं, त्यामुळे मानसिक धक्का बसून तणावाखाली गेलेल्या या तरुणाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

या प्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.  विजेचं बिल वाढवून पाठवण्यात आल्याने त्रस्त असलेल्या आमच्या मुलानं जीवन संपवलं. आमच्या तक्रारींचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान, सदर तरुणाने कौटुंबिक कारणांमुळे जीवन संपवल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल ऊर्जा मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

ही संपूर्ण घटना उन्नावमधील अचलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपूर वसैना गावातील आहे. येथील शुभम राजपूत हा तरुण मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. शुभमच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की, मागच्या महिन्यात वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या घरातील विजेचं बिल हे एक लाख रुपयांपेक्षा अधिक आलं होतं. या महिन्यातही विजेचं बिल हे ८ हजार रुपये आलं. त्यामुळे आमचा मुलगा त्रस्त झाला होता. एवढं बिल कुठून भरायचं, या चिंतेत होता. त्यामधूनच त्याने अखेरीस टोकाचं पाऊल उचललं.

शुभम याने २०२२ मध्ये ६०० रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली होती. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही या व्यतिरिक्त विजेचं कुठलंही उपकरण नव्हतं. तरीही १ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला वीज विभागाकडून १ लाख ९ हजार एवढं विजेचं बिल आलं होतं. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर वीज विभागाने विजेचं बिल घटवून १६ हजार ३७७ रुपये एवढं कमी केलं. शुभमने हे बिलं १४ सप्टेंबर रोजी कसंबसं भरलं. मात्र पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी विजेचं बिल ८ हजार २३३ रुपये एवढं आलं. त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आणि त्याने जीवन संपवलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज