शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:36 IST

Uttar Pradesh News: मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे.

मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. छोट्याशा घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही अशी मोजकीच विजेवर चालणारी उपकरणं असताना या तरुणाच्या घरचं विजेचं बिल एक लाख रुपयांच्या वर आलं होतं. पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा या तरुणाच्या घरचं विजबिल अव्वाच्या सव्वा आलं, त्यामुळे मानसिक धक्का बसून तणावाखाली गेलेल्या या तरुणाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

या प्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.  विजेचं बिल वाढवून पाठवण्यात आल्याने त्रस्त असलेल्या आमच्या मुलानं जीवन संपवलं. आमच्या तक्रारींचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान, सदर तरुणाने कौटुंबिक कारणांमुळे जीवन संपवल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल ऊर्जा मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

ही संपूर्ण घटना उन्नावमधील अचलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपूर वसैना गावातील आहे. येथील शुभम राजपूत हा तरुण मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. शुभमच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की, मागच्या महिन्यात वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या घरातील विजेचं बिल हे एक लाख रुपयांपेक्षा अधिक आलं होतं. या महिन्यातही विजेचं बिल हे ८ हजार रुपये आलं. त्यामुळे आमचा मुलगा त्रस्त झाला होता. एवढं बिल कुठून भरायचं, या चिंतेत होता. त्यामधूनच त्याने अखेरीस टोकाचं पाऊल उचललं.

शुभम याने २०२२ मध्ये ६०० रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली होती. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही या व्यतिरिक्त विजेचं कुठलंही उपकरण नव्हतं. तरीही १ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला वीज विभागाकडून १ लाख ९ हजार एवढं विजेचं बिल आलं होतं. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर वीज विभागाने विजेचं बिल घटवून १६ हजार ३७७ रुपये एवढं कमी केलं. शुभमने हे बिलं १४ सप्टेंबर रोजी कसंबसं भरलं. मात्र पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी विजेचं बिल ८ हजार २३३ रुपये एवढं आलं. त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आणि त्याने जीवन संपवलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज