शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:36 IST

Uttar Pradesh News: मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे.

मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. छोट्याशा घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही अशी मोजकीच विजेवर चालणारी उपकरणं असताना या तरुणाच्या घरचं विजेचं बिल एक लाख रुपयांच्या वर आलं होतं. पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा या तरुणाच्या घरचं विजबिल अव्वाच्या सव्वा आलं, त्यामुळे मानसिक धक्का बसून तणावाखाली गेलेल्या या तरुणाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

या प्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.  विजेचं बिल वाढवून पाठवण्यात आल्याने त्रस्त असलेल्या आमच्या मुलानं जीवन संपवलं. आमच्या तक्रारींचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान, सदर तरुणाने कौटुंबिक कारणांमुळे जीवन संपवल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल ऊर्जा मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

ही संपूर्ण घटना उन्नावमधील अचलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपूर वसैना गावातील आहे. येथील शुभम राजपूत हा तरुण मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. शुभमच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की, मागच्या महिन्यात वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या घरातील विजेचं बिल हे एक लाख रुपयांपेक्षा अधिक आलं होतं. या महिन्यातही विजेचं बिल हे ८ हजार रुपये आलं. त्यामुळे आमचा मुलगा त्रस्त झाला होता. एवढं बिल कुठून भरायचं, या चिंतेत होता. त्यामधूनच त्याने अखेरीस टोकाचं पाऊल उचललं.

शुभम याने २०२२ मध्ये ६०० रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली होती. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही या व्यतिरिक्त विजेचं कुठलंही उपकरण नव्हतं. तरीही १ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला वीज विभागाकडून १ लाख ९ हजार एवढं विजेचं बिल आलं होतं. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर वीज विभागाने विजेचं बिल घटवून १६ हजार ३७७ रुपये एवढं कमी केलं. शुभमने हे बिलं १४ सप्टेंबर रोजी कसंबसं भरलं. मात्र पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी विजेचं बिल ८ हजार २३३ रुपये एवढं आलं. त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आणि त्याने जीवन संपवलं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज