शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

एक कुटुंब, सहा महिन्यांच्या मुलाला सोडून तीन महिला झाल्या बेपत्ता, दागदागिने आणि रोकडही गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 19:57 IST

Chhattisgarh Crime News: एकाच कुटुंबातील तीन महिला एका सहा महिन्यांच्या मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला आपल्यासोबत दागदागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही घेऊन गेल्या. कुटुंबातील तीन महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन महिला एका सहा महिन्यांच्या मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिला आपल्यासोबत दागदागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कमही घेऊन गेल्या. कुटुंबातील तीन महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. नातेवाईकांनी त्यांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांची माहिती देणाऱ्याला २० हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. शहरातील वॉर्ड ५ मोतीसागरपाडा क्षेत्रातील ही घटना आहे. हे कुटुंब येथेच वास्तव्यास होते. दरम्यान, या कुटुंबातील तीन महिला १७ मार्च रोजी बेपत्ता झाल्या होत्या.

मात्र त्या अद्याप घरी परतलेल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीय त्रस्त आहेत. सहा महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन या महिला गेल्याने समस्या वाढल्या आहेत. या घटनेबाबत कुटुंब प्रमुख ताराबाई सारथी यांनी सांगितले की, फरार झालेल्या महिलांनी आपल्यासोबत दागदागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. मात्र त्याबाबत आमची काही तक्रार नाही. त्या जिथे कुठे असतील तिथून त्यांनी परत यावे. त्यांना याबाबत आम्ही काही बोलणार नाही.

तर कुटुंबातील अन्य एक सदस्य सरोजिनी सारथी यांनी सांगितले की, १७ मार्चपासूनच तिन्ही महिला बेपत्ता आहेत. त्यांची खूप शोधाशोध केली. मात्र आतापर्यंत त्यांची काहीच माहिती हाती लागलेली नाही. त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जी व्यक्ती त्यांच्याबाबत माहिती देईल, त्याला २० हजार रुपये बक्षीस दिलं जाईल. दरम्यान, सहा महिन्यांच्या मुलाला घरात सोडून महिला अशा प्रकारे निघून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या महिला घरातून जाताना रोख रक्कम आणि दागदागिने का घेऊन गेल्या असाव्यात, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. ही घटना घडल्यानंतर आठवडाभराने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनीही या महिलांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडFamilyपरिवार