शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:57 IST

न्या. अभय एस. ओक व न्या. उज्ज्वल भुइंया यांच्या पीठाने मंगळवारी म्हटले की, जेथे तपास यंत्रणा कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय लोकांना ताब्यात घेण्यासाठी मनमानी शक्तींचा वापर करतात, त्या लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये.

नवी दिल्ली : चौकशी पूर्ण झाल्यानंतरही कनिष्ठ न्यायालयांकडून कमी गंभीर प्रकरणांमध्ये जामीन याचिका फेटाळण्यात येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

न्या. अभय एस. ओक व न्या. उज्ज्वल भुइंया यांच्या पीठाने मंगळवारी म्हटले की, जेथे तपास यंत्रणा कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय लोकांना ताब्यात घेण्यासाठी मनमानी शक्तींचा वापर करतात, त्या लोकशाही देशाने ‘पोलिस राज’प्रमाणे काम करता कामा नये.  पीठाने म्हटले आहे की, दोन दशकांपूर्वी छोट्या प्रकरणातील जामीन याचिका उच्च न्यायालयांत फारच कमी पोहोचत असत. सर्वोच्च न्यायालयाची तर बातच सोडा.

या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कनिष्ठ न्यायालये व उच्च न्यायालयांनी जामीन देताना अधिक उदार दृष्टिकोन अवलंबावा, असा आग्रह न्यायालयाने वारंवार धरलेला आहे.

पीठाने एका आरोपीला जामीन दिला. फसवणुकीच्या एका प्रकरणात दोन वर्षांपासून तो ताब्यात होता. चौकशी पूर्ण झाली आणि आरोपपत्र दाखल झाले तरी आरोपीची जामीन याचिका कनिष्ठ न्यायालय व गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. 

आमच्यावर ओझे कशाला टाकता? जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्या. ओक यांनी म्हटले की, ज्या याचिकांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयांत व्हायला पाहिजे, त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करीत आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे. 

न्यायपालिकेवर अनावश्यकरीत्या ओझे टाकले जात आहे. जामीन निष्पक्ष आणि वेळेवर दिला जावा, यासह स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आग्रहही न्यायालयाने धरला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय