शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल, हिमंत बिस्वा सरमांच्या आदेशानंतर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 23:31 IST

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे.

भारत जोडो न्याय यात्रेवर निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये आहे. यादरम्यान राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा समरा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी घडत असून, आता मुख्यमंत्री सरमा यांनी दिलेल्या आदेशांनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधींसह, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर नेत्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी हे आसाममध्ये हिमंत बिस्वा सरमा यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसामची अवस्था बिकट झाली आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही आहेत. शेतकरी त्रस्त आहेत. आता आसाममध्ये न्याय यात्रेत अडथळे  आणले जात आहेत. मी ज्या कुणाबरोबर बोलतोय, तो मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, आता राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची माहिती हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावरून  दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, काँग्रेसच्या सदस्यांकडून आज झालेला हिंसाचार, चिथावणी, सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान, पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले याबाबत राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतर लोकांविरोधात कलम १२० बी, १४३/१४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAssamआसामcongressकाँग्रेस