शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

विरोधी ऐक्याला मोठा धक्का, भाजपाविरोधातील राष्ट्रव्यापी आघाडीत सहभागी होण्यास शिवसेनेच्या मित्रपक्षाने दिला नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:14 IST

K Chandrashekar Rao News: तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हैदराबाद - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एक राष्ट्रव्यापी आघाडी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्याची तयारी विरोधी पक्षांकडून सुरू आहे. मात्र तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या एका विधानामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राव यांनी बुधवारी सांगितले की, ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गैर-काँग्रेस आणि गैर-भाजपा पक्षांची राजकीय आघाडी तयार करण्याच्या बाजूने नाही आहेत. सध्या देशाला अशा आघाडीऐवजी टीआरएसप्रमाणे एका पर्यायी अजेंड्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

पक्षाच्या २१व्या स्थापना दिवशी झालेल्या बैठकीला संबोधित करताना के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, डाव्या पक्षांनी हल्लीच माझी भेट घेऊन केंद्रातून भाजपाला हटवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, सांगितले की, पंतप्रधानांना हटवण्याचा विषय चुकीचा होता. शेवटी लोकशाहीचा विजय झाला पाहिजे.

उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रशेखर राव यांनी केलेलं हे विधान त्यांच्या भाजपाविरोधातील आधीच्या विधानांपेक्षा एकदम विरुद्ध आहे. त्यांनी ११ एप्रिल रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यात मोदींना उद्देशून म्हटले होते की, त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये, अन्यथा जनता त्यांचे सरकार पाडेल. मात्र बुधवारच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, टीआरएस एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडे टीआरएसला राष्ट्रीय पक्षामध्ये बदलण्याचाही सल्ला आला होता. तसेच टीआरएसचं नाव बदलून भारतीय राष्ट्र समिती करण्याचाही सल्ला मिळाला होता.

दरम्यान, केसीआर यांनी सांगितले की, जर हैदराबादमधून देशाची दिशी बदलणार असेल तर ती तेलंगाणाच्या जनतेसाठी अभिमानाची बाब असेल. टीआरएस पर्यायी अजेंडा तयार करण्यासाठी आणि देशाला नवी दिशा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, पर्यायी शक्ती लवकरच समोर येईल आणि एक राजकीय वादळ निर्माण करील, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाPoliticsराजकारण