शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

संसदेचे ९४ तास वाया, कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; अधिवेशन आटोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:30 IST

२० जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. मणिपूरचा हिंसाचार आणि दिल्ली सेवा वटहुकुमाच्या निषेधार्थ झालेल्या गोंधळ गदारोळात लोकसभेचे ४५ टक्के कार्यक्षमतेने कामकाज होऊ शकले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसद सत्राच्या अखेरच्या दिवशी दोन्ही सभागृहे शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. मणिपूरवरील अविश्वास प्रस्ताव, त्यावर पंतप्रधान मोदींचे भाषण, विरोधकांचे निलंबन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेत पुनरागमन या घडामोडींमुळे संसदेचे हे सत्र लक्षणीय ठरले. गोंधळ आणि गदारोळाने गाजलेल्या या अधिवेशनातील १७ दिवसांत तब्बल ९४ तास वाया गेल्याने संसद चालवण्यासाठी लागणार्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.

२० जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. मणिपूरचा हिंसाचार आणि दिल्ली सेवा वटहुकुमाच्या निषेधार्थ झालेल्या गोंधळ गदारोळात लोकसभेचे ४५ टक्के कार्यक्षमतेने कामकाज होऊ शकले. सभागृहातील गदारोळाला केवळ एकाच दिवशी विराम लागला आणि प्रश्नोत्तराचा तास निर्वेधपणे पार पडून सर्व २० तारांकित प्रश्नांची मौखिक उत्तरे दिली जाण्याचा दुर्मीळ दिवस ९ ऑगस्ट रोजी उगवला. 

मलोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले. मात्र, नंतर अपेक्षेप्रमाणे अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. 

५०तास राज्यसभेत वाया n संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत एकूण १७ दिवस कामकाज झाले. n त्यात गदारोळामुळे एकूण ५० तास आणि २१ मिनिटे वाया गेली.n ज्यामुळे २६०व्या सत्राच्या एकूण उत्पादकतेवर विपरित परिणाम झाला.

४४तास लोकसभेत वाया n अधिवेशनादरम्यान लोकसभेत १७ दिवस कामकाज चालले. n ज्यामध्ये ४४ तास १३ मिनिटे काम करण्यात आले. n ते म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात लोकसभेची कार्य उत्पादकता ४६% होती.

आपचे ज्येष्ठ सदस्य संजय सिंह यांचे निलंबन पावसाळी अधिवेशनानंतरही कायम राहील, असे सभापती धनखड यांनी सांगितले.  

महत्त्वाची मंजूर विधेयकेअधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाच्या विधेयकांमध्ये बहुराज्य सहकारी संस्था दुरुस्ती विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि प्रसुती आयोग विधेयक, राष्ट्रीय दंत आयोग विधेयक, सार्वजनिक न्यासाच्या तरतुदींचे दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय राजधानी दिल्ली सरकार क्षेत्र दुरुस्ती विधेयक आणि अंतर सेवा संस्था नियंत्रण आणि शिस्त विधेयक यांचा समावेश आहे.

मी निलंबित राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा. मला का निलंबित करण्यात आले? माझा गुन्हा काय आहे? मी संसदेत उभा राहून जगातील सर्वांत मोठा पक्ष भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले, हा माझा गुन्हा आहे का? लोकशाही अशी टिकणार नाही.    - राघव चढ्ढा, खासदार, आप

टॅग्स :lok sabhaलोकसभा