शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पाण्याच्या योजनांसाठी १३ जिल्ह्यांना ९२६ कोटी; जालना, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 05:35 IST

महाराष्ट्रातील टंचाईच्या भागांत भूजलाचे संवर्धन करणार

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रासहपाणीटंचाईचा सहा राज्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेसोबत ‘अटल भूजल योजना’ सुरू केली आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या या योजनेत महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांचा समावेश आहे.

जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरयाणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यांत अटल भूजल योजना सुरू केली आहे. ती केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या निम्म्या निम्म्या भागीदारीतून पूर्ण केली जाईल.

कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, अहमदनगर, नाशिक आणि नागपूरचा समावेश आहे. या जिल्ह्यांत भूजलाची पातळी खाली गेल्याची कारणे व त्यांच्या सामुदायिकरित्या उत्तरांसाठी ९२५.७७ कोटी रुपये दिले जातील.

भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना कटारिया म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२०-२०२१ च्या या योजनेअंतर्गत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थायी भूजल व्यवस्थापन, सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून टंचाईच्या भागांत भूजलाचे संवर्धन केले जाईल.

टॅग्स :WaterपाणीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र