शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 13:51 IST

दूध भेसळीच्या ४० वर्ष जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला एका ९० वर्षीय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

४२ वर्षापूर्वी दुधात भेसळ केल्याप्रकरणी एका ९० वर्षाच्या व्यक्तीला उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी आता त्या व्यक्तीने सर्वाच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  उच्च न्यायालयाने २९  वर्षांनंतर शिक्षा सुनावली. कोर्टाचे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. 

कोल्हापूरच्या घटनेवरून शरद पवारांचा गंभीर आरोप; "सत्ताधारी पक्ष या घटनांना...

उच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर १० वर्षांनंतर या व्यक्तीला गेल्या महिन्यात कनिष्ठ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंटवर अटक करण्यात आली होती. आता तो व्यक्ती ९० वर्षांचा आहे. या शिक्षेला आव्हान देत त्यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एका दिवसानंतर, सर्वोच्च न्यायालयाचे  खंडपीठ त्यावर सुनावणी करेल. 

वीरेंद्र कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. ४० वर्षापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानेही त्यांना शिक्षा सुनावली होती. गेल्या महिन्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. कुमार यांनी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केली असून अपीलावर निर्णय होईपर्यंत जामीन मागितला आहे. मंगळवारी, त्यांचे वकील अजेश कुमार चावला यांच्या विनंतीवरून, न्यायमूर्ती अनिर्द्ध बोस आणि राजेश बिंदल यांच्या सुट्टीतील खंडपीठाने गुरुवारी याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले.

७ ऑक्टोबर १९८१ रोजी वीरेंद्र कुमार यांना अन्न निरीक्षकांनी दुधात भेसळ केल्याप्रकरणी पकडले. तेव्हा ते ४८ वर्षांचे होते. ते दूध विक्रेता म्हणून काम करत नाही तर बस कंडक्टर होते असा त्यांनी दावा केला आहे. २९ सप्टेंबर १९८४ रोजी खुर्जाच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांना अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवले. त्याविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली. १४ जुलै १९८७ रोजी बुलंदशहर सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर हे प्रकरण २६ वर्षे अलाहाबाद उच्च न्यायालयात चालले. ३० जानेवारी २०१३ रोजी हायकोर्टानेही वीरेंद्र कुमारला दोषी ठरवले होते.

अन्न निरीक्षक वीरेंद्र कुमार यांच्याकडून घेतलेल्या दुधाच्या नमुन्यात भेसळ आढळून आली. ट्रायल कोर्टात आपल्या बचावात कुमार यांनी युक्तिवाद केला की ते बस कंडक्टर होते आणि दूध विक्रीच्या व्यवसायात नव्हते. ७ ऑक्‍टोबर १९८१ रोजी ते धार्मिक कार्यासाठी मिळालेले दूध घेऊन जात होते, असाही त्यांनी दावा केला आहे.

पुरावे तपासल्यानंतर ट्रायल कोर्ट या निष्कर्षाप्रत आले की, किरयावली गाव ते कल्याणपूर गाव हे १९ किलोमीटरचे अंतर आहे. एखादी व्यक्ती केवळ धार्मिक विधीसाठी दूध देण्यासाठी ३८ किलोमीटरचा प्रवास करेल यावर विश्वास ठेवता येत नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJara hatkeजरा हटकेCourtन्यायालय