शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

नरेंद्र मोदींच्या 90 टक्के मंत्र्यांना देशातील जनता ओळखत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 22:39 IST

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका नरेंद्र मोदी सरकारवर गुरुवारी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर निशाणा साधला.

ठळक मुद्देमंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाहीनरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर टीकेची झोड

नवी दिली : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एका नरेंद्र मोदी सरकारवर गुरुवारी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही, अशा शब्दांत त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर निशाणा साधला. दरम्यान, याआधी पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला होता.गुरुवारी एका कार्यक्रानंतर पत्रकारांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी हा हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले, मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के लोकांना देशातील जनता ओळखत नाही आणि उरलेल्या 10 टक्के लोकांबद्दल जनतेला आदर वाटत नाही. मोदींचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या कामाबद्दल जनतेला कोणतीही माहिती नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील 90 टक्के चेहरे जनतेसाठी अनोळखी आहेत. तर बाकीच्या 10 टक्के मंत्र्यांनी जनतेच्या मनात असलेला आदर गमावलेला आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, काल शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून पद्मावती वादावर मौन बाळगल्याप्रकरणी नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पद्मावती सध्या ज्वलंत मुद्दा आहे. या मुद्यावर महान अभिनेते अमिताभ बच्चन, अष्टपैलू आमीर खान आणि प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांन काहीच वक्तव्य कसे केले नाही असा प्रश्न लोक विचारु लागले आहेत. याचबरोबर, आपले माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सर्वात लोकप्रिय पंतप्रधान (पीईडब्ल्यूनुसार) नरेंद्र मोदींनी मौन का बाळगले आहे', असा सवाल शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा