शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या, एका महिन्यात 90 शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 16:25 IST

जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे

बंगळुरु, दि. 19 - कर्नाटकात दुष्काळाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या अजूनही सुरुच आहेत. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. 

सरकारने कर्जमाफीसाठी पावलं उचलली जात असल्याची घोषणा केली असली तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. 15 ऑगस्ट रोजी रमेश नावाच्या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली होती. दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. रमेशच्या नावे एक एकर जमीन होती. सुरुवातीच्या तपासादरम्यान डोक्यावर दोन लाखाचं कर्ज असल्याने रमेशने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. कृषी विभाग आणि स्थानिक अधिकारी रमेशच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिन्याच्या अखेरपर्यंत नेमकी माहिती हाती लागेल. 

जुलै महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येमधील 50 टक्के आत्महत्या कावेरीजवळील परिसरात झाल्या आहेत. मंड्या, म्हैसूर, हासन आणि कोडागू येथे 48 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 30 जूनपर्यंत मंड्या येथे एकूण आठ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 31 जुलैपर्यंत हा आकडा 29 वर पोहोचला. याचप्रमाणे म्हैसूर येथे मृतांचा आकडा 11 वरुन 25 वर पोहोचला आहे. हासन येथे जून महिन्यात सात शेतक-यांनी आत्महत्या केली. जुलै अखेरपर्यंत आत्महत्येचा आकडा 19 झाला होता. बागलकोट आणि बेळगावात जून महिन्यात सहा-सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. जो आकडा नंतर अनुक्रमे 12 आणि 22 झाला. 

टॅग्स :Farmerशेतकरी