शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जगातील टॉप ५० मध्ये भारताच्या ९ शिक्षण संस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:29 IST

२ आयआयएम, जेएनयूच्या क्रमवारीत झाली घसरण

नवी दिल्ली : क्यूएस विषयांच्या क्रमवारीत जगातील टॉप ५० मध्ये नऊ भारतीय विद्यापीठे आणि संस्थांचा समावेश आहे. तीन आयआयटी, दोन आयआयएम आणि जेएनयूसारख्या काही संस्थांचा यात समावेश आहे. मात्र, दोन आयआयएम आणि जेएनयूच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. 

लंडनस्थित क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) द्वारे बुधवारी जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ रँकिंग बाय सब्जेक्टच्या १५ व्या आवृत्तीनुसार, विषय क्रमवारी आणि व्यापक प्राध्यापकांच्या क्षेत्रात भारताने टॉप ५० मध्ये १२ स्थान मिळवले आहे. धनबाद येथील इंडियन स्कूल ऑफ माइन्स (आयएसएम) अभियांत्रिकी - खनिजे आणि खाणकाम या विषयासाठी जागतिक स्तरावर २० व्या क्रमांकावर आहे.

क्रमवारीत घसरण कुठे? 

अभियांत्रिकी-खनिज आणि खाणकाम विषयासाठी आयआयटी, मुंबई आणि खरगपूर अनुक्रमे २८ व्या आणि ४५ व्या क्रमांकावर आहेत. मात्र, दोन्ही संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

आयआयएम, अहमदाबाद आणि बंगळुरू हे व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी जगातील टॉप ५० मध्ये राहिले; परंतु त्यांचे रँकिंगही गेल्या वर्षीपेक्षा घसरले. आयआयएम अहमदाबादचे रँकिंग २२ वरून २७ वर घसरले आहे.

भारत पाचव्या क्रमांकावर 

विशिष्ट क्रमवारीच्या यादीत, भारत हा चीन, अमेरिका, यूके आणि कोरियानंतर पाचव्या क्रमांकावर आहे आणि एकूण नोंदींच्या संख्येत १२ व्या क्रमांकावर आहे. जरी भारत एआयमध्ये ताकद दाखवत असला, तरी उद्योजकीय क्षमतांमध्ये गंभीर अंतर कायम आहे.    

टॅग्स :Indiaभारत