शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

हृदयद्रावक! वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नी दिला; 9 मुलींनी पार पाडलं कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 3:13 PM

वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. या मुलींनी फक्त अंत्यसंस्कारच केले नाहीत, तर वडिलांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले. हे दृश्य पाहून काही लोक रडायला लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस एएसआय हरिश्चंद्र अहिरवार हे वॉर्ड क्रमांक 17 मधील 10व्या बटालियन भागातील रहिवासी होते. ब्रेन हॅमरेजमुळे सोमवारी त्यांचं निधन झालं. हरिश्चंद्र यांना नऊ मुली आहेत. मुलगा नाही. हरिश्चंद्र यांनी मुलाप्रमाणेच आपल्या सर्व मुलींना वाढवलं. 7 मुलींचं लग्न केलं. आता त्याच मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडलं.

मुलींनी वडिलांना खांदा दिला आणि इतर विधी पार पाडले. 7 मुली विवाहित आहेत तर मुली रोशनी आणि गुडिया अविवाहित आहेत. मुलगी वंदनाने सांगितले की, वडिलांचं मुलींवर खूप प्रेम होतं. आम्हाला एकही भाऊ नाही, त्यामुळे सर्व लहान आणि मोठ्या बहिणींनी (अनिता, तारा, जयश्री, कल्पना, रिंकी, गुडिया, रोशनी आणि दुर्गा) मिळून मुलाचं कर्तव्य पार पाडायचं ठरवलं. 

आमचे वडीलच आमच्यासाठी सर्वकाही होते असं देखील मुलींनी म्हटलं आहे. बुंदेलखंडमध्ये मुली आणि महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. पण आता समाजातील जुन्या परंपरा आणि समजुती मोडून लोक पुढाकार घेत असलेलं पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले असून नवा आदर्श निर्माण केला आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश