शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सीबीएसई बारावी परीक्षेत ८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, विद्यार्थिनींनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 00:05 IST

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला असून, इतिहासात यंदा प्रथमच कोणीही टॉपर नाही व गुणवत्ता यादीही जाहीर केलेली नाही. ज्या विषयांची परीक्षा घेण्यात आली नव्हती, त्यामध्ये सरासरी गुण देण्यात आले आहेत. यापूर्वी सीआयएससीईनेही दहावी-बारावीचा निकाल जाहीर करताना टॉपर जाहीर केला नव्हता.सीबीएसईचे परीक्षा नियंत्रणक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यात ९२.१५ टक्के विद्यार्थिनी व ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ५.९६ टक्के जास्त विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीचा निकाल ८३.४० टक्के लागला होता. यंदा १२,०३,५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११,९२,९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १०,५९,०८० विद्यार्थी पास झाले. विभागवार निकाल पाहता त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक (९७.६७ टक्के) लागला आहे. त्यानंतर बंगळुरू ९७.०५ टक्के, चेन्नई ९६.१७ टक्के व दिल्लीचा निकाल ९४.३९ टक्के आहे. पुणे विभाग नवव्या क्रमांकावर असून, निकाल ९०.२४ टक्के लागला. कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे सीबीएसईला प्रलंबित परीक्षा रद्द करावी लागली होती. तथापि, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालात सुधारणा करायची आहे, ते या परीक्षेला बसू शकतात.निकाल पाहण्यात अडथळेसीबीएसईची वेबसाईट ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ निकाल पाहता आला नाही. उमंग अ‍ॅपवर निकाल दिसत नव्हता व आयव्हीआरएस सेवेवरही फोन व्यग्र येत होता, अशा तक्रारी होत्या.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षण