शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
2
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
3
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
4
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
5
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
6
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
7
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
8
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
9
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
10
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
11
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
12
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
13
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
14
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
15
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
16
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
17
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
18
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
19
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
20
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

डायबेटीज, हायपरटेंशन अन् बरच काही, या 81 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली कोरोनाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:35 IST

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे. 

ठळक मुद्देकुलवंत निर्मल कौर या मोहाली जिल्ह्यातील मॅक्स हॉस्पिटलमधून दाखल होत्याया आजींनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानलेयापूर्वीही केरळमधी एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर मात केली होती

मोहाली - म्हणतातना, प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असेल, तर कोणत्याही संकटावर अगदी सहजपणे मात करता येते. मग वय काहीका असेना. याची प्रचिती आली आहे पंजाबमध्ये.पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील तब्बल 81 वर्षांच्या कुलवंत निर्मल कौर यांनी, संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला धोबीपछाड दिली आहे. 

कुलवंत यांनी कोरोना झाला असतानाही हार मानली नाही. यामुळेच त्यांना कोरोनावर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे त्या 81 वर्षांच्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांना मधुमेह, हायपरटेंशनबरोबरच पाच स्टेंट्स देखील आहेत. असे असतानाही त्यांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. त्या सोमवारी येथील मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी गेल्या.

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे. 

या वृद्धांनीही दिली आहे कोरोनाला टक्कर अन् जिंकली लढाली -

यापूर्वी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एका कोरोनाग्रस्त व्यक्तीला आणि त्यांच्या पत्नीला पूर्णपणे बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की थॉमस अब्राहम (93) आणि त्यांची पत्नी मरियम्मा (88) हे कोट्टायमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय 9 मार्चपासून जीनव-मरणाशी संघर्ष करत होते. यात त्यांचा विजय झाला.

मुलगा आणि सुनेपासून झाला होता संसर्गएका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसा, 'थॉमस आणि मरियम्मा आता ठीक आहेत. त्यांची कोरोनाव्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.' ते केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील रन्नी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा, सून आणि नातू गेल्या महिन्यात इटलीहून परतले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतKeralaकेरळPunjabपंजाब