शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

3 दिवसांत 800 कार्यकर्त्ये ताब्यात; उद्या काँग्रेस देशभरातील राजभवनांचा घेराव घालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 15:58 IST

Congress Protest: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून सलग तिसर्‍या दिवशी चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून प्रचंड विरोध होत आहे.

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून सलग तिसर्‍या दिवशी चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांच्या वतीने पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांवर केलेल्या कारवाईवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशभरात निदर्शने होणारसुरजेवाला म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून गुंडगिरी केली जात आहे. हे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही. त्याचा हिशोब द्यावा लागेल. आम्ही एफआयआर नोंदवण्याची मागणी करत आहोत. त्याचबरोबर शिस्तभंगाचीही चौकशी सुरू करावी. आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्या देशातील सर्व राजभवनांचा घेराव करून परवा जिल्हास्तरावर जोरदार निदर्शने होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

'सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या जातील'पोलिसांच्या कारवाईवर रणदीप सुजरेवाला यांनी ट्विट केले की, दहशत आणि अत्याचाराचा हा नंगा नाच, संपूर्ण देश पाहत आहे. मोदीजी, अमित शाह आणि दिल्ली पोलीस, सर्वकाही लक्षात ठेवलं जाईल. मुख्यमंत्री, खासदार, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आणि महिलांवर अत्याचार केल्यानंतर आता देशातील प्रमुख विरोधी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला गेला, असंही ते म्हणाले.

150 जणांना ताब्यात घेण्यात आलेतर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष कायदा आणि सुव्यवस्था डीपी हुड्डा म्हणाले की, आजही काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आले आहेत, आम्ही सांगूनही काही लोकांनी ऐकले नाही. विविध ठिकाणांहून 150 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, तीन दिवसांत आतापर्यंत सुमारे 800 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हुड्डा म्हणाले की, आम्ही काँग्रेसच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की, तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर तुम्ही जंतरमंतरवर जाऊ शकता, परंतु त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यांचा आरोप काहीही असला तरी तो चुकीचा आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी