शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 11:07 IST

यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज त्या ठिकाणी नसते, जिथे ते आहेत असं म्हटलं आहे

ठळक मुद्देअरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीअरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं यशवंत सिन्हा बोललेत'समस्या समजून घेण्यापेक्षा सरकार आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे'

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीये. यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याला अरुण जेटली जबाबदार आहेत असं यशवंत सिन्हा बोलले होते. उत्तर देताना अरुण जेटली बोलले होते की, 'यशवंत सिन्हा 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत. मी अद्याप तरी अशा स्थितीत नाही की माजी अर्थमंत्री म्हणून वृत्तपत्रात लेख लिहीन'.

अरुण जेटली यांच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हा यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकार परिस्थिती समजून घेण्यामध्ये पुर्णपणे अयशस्वी ठरली आहे. समस्या समजून घेण्यापेक्षा आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात ते व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे', असं यशवंत सिन्हा बोलले आहेत. यशवंत सिन्हा यांनी आपला मुलगा जयंत सिन्हा याला आपल्याविरोधात मैदानात उतरवल्यावरुन सरकारवर टीका करत हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या बातचीतमध्ये यशवंत सिन्हा यांनी सांगितलं आहे की, 'जे म्हणत आहेत की हा माझा वैयक्तिक हल्ला किंवा टीका आहे, ते चुकीचं आहे. जर अर्थव्यवस्थेशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल तर त्यासाठी अर्थमंत्रीच जबाबदार असणार. यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना जबाबदार धरु शकत नाही. माझा मुलगा जयंत सिन्हाला माझ्याविरोधात उतरवत सरकार मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. मीदेखील वैयक्तिक हल्ले करु शकतो. पण मला त्यांच्या जाळ्यात अडकण्याची इच्छा नाही'. 

काय म्हणाले होते यशवंत सिन्हा ?अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले.

जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत

अरुण जेटलींनी दिलं होतं उत्तर माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले. धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.

कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही'.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा