शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

८0 हजार जागा घटणार, २०० अभियांत्रिकी महाविद्यालये होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:08 IST

एकेकाळी ज्या अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असायची त्या अभियांत्रिकीबद्दलचे आकर्षण कमी होताना दिसत आहे.

नवी दिल्ली : एकेकाळी ज्या अभियांत्रिकीच्या (इंजिनिअरिंग) प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असायची त्या अभियांत्रिकीबद्दलचे आकर्षण कमी होताना दिसत आहे. आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या म्हणण्यानुसार, २०० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ही महाविद्यालये बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. दुसऱ्या आणि तिसºया दर्जाचे हे अभियांत्रिकी महाविद्यालये आता प्रवेश देणार नाहीत. यावर्षी अभियांत्रिकीच्या ८० हजार जागा कमी होण्याचा अंदाज आहे. चार वर्षांत ३.१ लाख जागा कमी होणार आहेत. २०१६ पासून अभियांत्रिकीच्या जागांची संख्या कमी होत चालली आहे. एआयसीटीईच्या माहितीनुसार, जवळपास ७५ हजार जागा दरवर्षी कमी होत आहेत. २०१६-१७ मध्ये अंडरग्रॅज्युएट स्तरावर प्रवेश क्षमता १५,७१,२२० होती. प्रत्यक्षात ७,८७,१२७ प्रवेश झाले. म्हणजे, यात ५० टक्के घट झाली. २०१५-१६ मध्ये एकूण प्रवेश क्षमता १६,४७,१५५ होती. प्रत्यक्षात प्रवेश ८,६०,३५७ प्रवेश झाले. यात ५२ टक्के घट झाली. २०१६-१७ मध्ये आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीचे शिक्षण देणाºया ३,४१५ संस्थांपैैकी ५० टक्के संस्था बंद झाल्या आहेत. बंद करण्यास अर्ज केला आहे त्यापैकी बहुतांश संस्थांत गत तीन वर्षांत २० टक्के प्रवेश कमी झाले आहेत. या संस्था उच्च दर्जाच्या नसल्यामुळे विद्यार्थी येथे प्रवेश घेण्यास प्राधान्य देत नाहीत. याउलट आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेशांची संख्या वाढत आहे. या संस्थांमध्ये प्रवेश क्षमता ३०० ते ४०० आहे.>नवीन प्रवेश नाही..एआयसीटीईच्या माहितीनुसार, जवळपास २०० अभियांत्रिकी महाविद्यालये बंद होणार असली, तरी सध्याच्या बॅच पदवीधर होईपर्यंतच ते चालू राहतील आणि नवीन प्रवेश देण्यात येणार नाहीत. तथापि, इंंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थांच्या प्रवेशासाठी अद्यापही स्पर्धा आहे.