शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कतारमध्ये ८ माजी नौसैनिकांची फाशी अशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीची Inside Story      

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:10 IST

India & Qatar Diplomacy: आठ माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेली शिक्षा यामुळे भारत आणि कतार यांच्यामधील संबधांमध्ये तणाव वाढला होता. मात्र आता ज्या प्रकारे या नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ही बाब भारताच्य मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.

हेरगिरीच्या आरोपामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना काल कतारमधील न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने या नौसैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता हे माजी नौसैनिक भारतात सुखरूप परतण्याची आशा वाढली आहे. नुपूर शर्मा प्रकरण, तसेच या आठ माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेली शिक्षा यामुळे भारत आणि कतार यांच्यामधील संबधांमध्ये तणाव वाढला होता. मात्र आता ज्या प्रकारे या नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ही बाब भारताच्य मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे. यादरम्यान पडद्यामागे काय काय घडलं, याची इनसाइड स्टोरी पुढीलप्रमाणे आहे.

२०१६ मध्ये नरेंद्र मोदी हे कतारच्या दौऱ्यावर गेले असताना म्हणाले होते की, येथील राज्यकर्ते भारतीय समुदायावर खूप प्रेम करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मला खात्री आहे की जेव्हा कधी आम्ही त्यांच्यासमोर एखादी गोष्ट मांडतो. तेव्हा ते त्यावर उपाय शोधून काढतात. आतापर्यंत मी जे काही सांगितलं आहे, त्याबाबत मला सकारात्मक परिणाम दिसले आहेत. आता या आठ भारतीय माजी नौसैनिकांच्या प्रकरणामध्येही मोदींनी तेव्हा केल्या विधानाचा आधार घेत मार्ग काढण्यात आला असावा. त्याचं कारण म्हणजे २ डिसेंबर २०२३ रोजी रोजी दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांची ज्या सारात्मकपणे भेट झाली, त्यामधून कतारमधील तुरुंगात कैदेत असलेल्या ८ भारतीयांच्या कुटुंबाना लवकरच आनंददायक बातमी मिळेल, असं बोललं जात होतं. आता या माजी नौसैनिकांच्या फाशीला मिळालेल्या स्थगितीला मोदी आणि कतारचे आमीर यांच्यात झालेली सकारात्मक भेट तर कारणीभूत ठरली नाही ना, अशी चर्चा होत आहे.

२ डिसेंबर २०२३ रोजी रोजी दुबईमध्ये झालेल्या या भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी कतारच्या आमिरांसमोर ८ भारतीय माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा मुद्दा मांडला असावा, त्यानंतर पुढील सकारात्मक घडामोडी घडल्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रश्नाचं नेमकं उत्तर कुणाकडेही नाही आहे. पण २ डिसेंबर रोजी झालेल्या या भेटीनंतर लगेच ३ डिसेंबर रोजी कतारने भारताच्या राजदुतांनी तुरुंगात असलेल्या या ८ भारतीय माजी नौसैनिकांची भेट घेण्याची परवानगी दिली. तसेच पुढच्या २६ दिवसांमध्येच या सैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात पडद्याआडून कतारची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता का आणि त्यामुळेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ३० ऑक्टोबर रोजी हा मुद्दा सरकारच्या प्राथमिकतेमध्ये आहे, असं म्हटलं होतं का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कतारमध्ये कैदेत असलेले भारतीय माजी नौसैनिक हे फाशीपासून वाचले असले तरी त्यांना भारतात आणणं शक्य आहे का? याबाबत आता चाचपणीला सुरुवात झाली आहे. २ डिसेंबर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटने  भारत आणि कतारदरम्यान शिक्षा झालेल्या व्यक्तींच्या स्थानांतरणाच्या कराराला मान्यता दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये दोन्ही देशांदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानुसार कतारमध्ये शिक्षा झालेले भारतीय कैदी त्यांची उर्वरित शिक्षा भारतात पूर्ण करू शकतात. तसेच कतारचा एखादा नागरिक भारतात शिक्षा भोगत असेल, तर तो कतारमध्ये जाऊन आपली शिक्षा पूर्ण करू शकतो. कतारने या आठ भारतीय माजी नौसैनिकांना मध्यरात्री ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलं असलं तरी त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारची कुटनीतिक चर्चा सुरू आहे, त्यामुळे या आठ भारतीय माजी नौसैनिकांच्या भारतात परतण्याच्या आशा कायम आहेत.  

टॅग्स :IndiaभारतQatarकतारNarendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदल