शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

कतारमध्ये ८ माजी नौसैनिकांची फाशी अशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीची Inside Story      

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:10 IST

India & Qatar Diplomacy: आठ माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेली शिक्षा यामुळे भारत आणि कतार यांच्यामधील संबधांमध्ये तणाव वाढला होता. मात्र आता ज्या प्रकारे या नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ही बाब भारताच्य मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.

हेरगिरीच्या आरोपामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना काल कतारमधील न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने या नौसैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता हे माजी नौसैनिक भारतात सुखरूप परतण्याची आशा वाढली आहे. नुपूर शर्मा प्रकरण, तसेच या आठ माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेली शिक्षा यामुळे भारत आणि कतार यांच्यामधील संबधांमध्ये तणाव वाढला होता. मात्र आता ज्या प्रकारे या नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ही बाब भारताच्य मुत्सद्देगिरीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे. यादरम्यान पडद्यामागे काय काय घडलं, याची इनसाइड स्टोरी पुढीलप्रमाणे आहे.

२०१६ मध्ये नरेंद्र मोदी हे कतारच्या दौऱ्यावर गेले असताना म्हणाले होते की, येथील राज्यकर्ते भारतीय समुदायावर खूप प्रेम करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवतात. मला खात्री आहे की जेव्हा कधी आम्ही त्यांच्यासमोर एखादी गोष्ट मांडतो. तेव्हा ते त्यावर उपाय शोधून काढतात. आतापर्यंत मी जे काही सांगितलं आहे, त्याबाबत मला सकारात्मक परिणाम दिसले आहेत. आता या आठ भारतीय माजी नौसैनिकांच्या प्रकरणामध्येही मोदींनी तेव्हा केल्या विधानाचा आधार घेत मार्ग काढण्यात आला असावा. त्याचं कारण म्हणजे २ डिसेंबर २०२३ रोजी रोजी दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांची ज्या सारात्मकपणे भेट झाली, त्यामधून कतारमधील तुरुंगात कैदेत असलेल्या ८ भारतीयांच्या कुटुंबाना लवकरच आनंददायक बातमी मिळेल, असं बोललं जात होतं. आता या माजी नौसैनिकांच्या फाशीला मिळालेल्या स्थगितीला मोदी आणि कतारचे आमीर यांच्यात झालेली सकारात्मक भेट तर कारणीभूत ठरली नाही ना, अशी चर्चा होत आहे.

२ डिसेंबर २०२३ रोजी रोजी दुबईमध्ये झालेल्या या भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी कतारच्या आमिरांसमोर ८ भारतीय माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा मुद्दा मांडला असावा, त्यानंतर पुढील सकारात्मक घडामोडी घडल्या, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रश्नाचं नेमकं उत्तर कुणाकडेही नाही आहे. पण २ डिसेंबर रोजी झालेल्या या भेटीनंतर लगेच ३ डिसेंबर रोजी कतारने भारताच्या राजदुतांनी तुरुंगात असलेल्या या ८ भारतीय माजी नौसैनिकांची भेट घेण्याची परवानगी दिली. तसेच पुढच्या २६ दिवसांमध्येच या सैनिकांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात पडद्याआडून कतारची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता का आणि त्यामुळेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ३० ऑक्टोबर रोजी हा मुद्दा सरकारच्या प्राथमिकतेमध्ये आहे, असं म्हटलं होतं का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कतारमध्ये कैदेत असलेले भारतीय माजी नौसैनिक हे फाशीपासून वाचले असले तरी त्यांना भारतात आणणं शक्य आहे का? याबाबत आता चाचपणीला सुरुवात झाली आहे. २ डिसेंबर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटने  भारत आणि कतारदरम्यान शिक्षा झालेल्या व्यक्तींच्या स्थानांतरणाच्या कराराला मान्यता दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये दोन्ही देशांदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या करारानुसार कतारमध्ये शिक्षा झालेले भारतीय कैदी त्यांची उर्वरित शिक्षा भारतात पूर्ण करू शकतात. तसेच कतारचा एखादा नागरिक भारतात शिक्षा भोगत असेल, तर तो कतारमध्ये जाऊन आपली शिक्षा पूर्ण करू शकतो. कतारने या आठ भारतीय माजी नौसैनिकांना मध्यरात्री ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलं असलं तरी त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारची कुटनीतिक चर्चा सुरू आहे, त्यामुळे या आठ भारतीय माजी नौसैनिकांच्या भारतात परतण्याच्या आशा कायम आहेत.  

टॅग्स :IndiaभारतQatarकतारNarendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदल