शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

पाच वर्षांत ७५ हजार डाॅक्टर्स मिळणार; MBBS च्या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:05 IST

कोविड, जीबीएस, बर्ड फ्लू आदी आजारांशी लढताना, तसेच आरोग्याशी निगडित प्रश्न हाताळताना डॉक्टरांची कमतरता भासते. वाढीव एमबीबीएसच्या जागांमुळे मोलाची मदत शासनास होणार आहे.

डॉ. प्रवीण शिनगारेमाजी संचालक - वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

केंद्राच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पालकांना दिलासा देणारे निवेदन केले आहे. यावर्षी देशात १० हजार एमबीबीएसच्या जागा वाढणार व येत्या ५ वर्षांत एकूण ७५ हजार जागांची वाढ होणार आहे. देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षेला (नीट यूजी) दरवर्षी साधारणपणे २५ लाख विद्यार्थी बसतात व त्यातील १२ लाख पात्र होतात. या पात्र विद्यार्थ्यांसाठी देशात फक्त एक लाख ८ हजार एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सरासरी २० ते २५ हजार विद्यार्थी भारतात एमबीबीएसला प्रवेश मिळत नाही म्हणून परदेशात डॉक्टर होण्यासाठी जातात.  

देशात आर्थिक तरतुद शासनाने केल्यास वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येऊ शकतात. परंतु वैद्यकीय महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक तो शिक्षक (फॅकल्टी) थोड्या कालावधीत तेवढा मोठ्या संख्येने निर्माण केला जाऊ शकत नाही. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय शिक्षकांचे निकष कमी केलेले आहेत. हे निकष लवकरच अंतिम होतील. यामध्ये रुग्णसेवेचा शासनामध्ये अनुभव असलेला, परंतु शिकवण्याचा शून्य अनुभव असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास, वैद्यकीय शिक्षक म्हणून पात्र समजले जाणार आहे. याचबरोबर शैक्षणिक पात्रता असलेले व्यावसायिक डॉक्टर यांना व्हिजिटिंग अध्यापक म्हणून नेमणूक देता येईल. एमबीबीएसनंतरची पदविका (पदव्युत्तर पदवी - एमडी / एमएस नव्हे) अहर्ताधारक वैद्यकीय शिक्षक म्हणून शासनास नेमता येतील. अशा प्रकारे वैद्यकीय शिक्षक होण्यासाठी निकष कमी केल्यामुळे शिक्षक मिळतील, पण ते दर्जेदार शिक्षण देऊ शकतील का? हा खरा प्रश्न आहे. परदेशातील शिक्षकांपेक्षा हे वैद्यकीय शिक्षक निश्चितपणे चांगले शिक्षण देऊ शकतील.

परदेशातील वैद्यकीय शिक्षक हा जानेवारीमध्ये एका शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात शिकवतो व अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारीमध्ये शेजारच्याच शहरातील दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवायला जातो. अशा प्रकारे ४ महिन्यांत ४ वैद्यकीय महाविद्यालयांत शिकवल्यानंतर पुन्हा  तो पहिल्या महाविद्यालयात हजर होतो. काही देशांमध्ये एकच वैद्यकीय अध्यापक एकाच वेळेस ऑनलाइन पद्धतीने ५ ते ७ वैद्यकीय महाविद्यालयांतील ७०० ते १००० विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. या सर्व देशांमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासारख्या वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाची निरीक्षणे करणारी किंवा त्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नाही. हा सर्व प्रकार पाहिल्यावर असे लक्षात येईल की, नजीकच्या ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा एमबीबीएसच्या वाढल्या तरी हे सर्व देशात तयार होणारे डॉक्टर परदेशातून ५ वर्षांत येणाऱ्या ७५ हजारांपेक्षा जास्त डॉक्टरांपेक्षा निश्चितच सरस असतील. परदेशातून येणाऱ्या या दरवर्षीच्या २५ हजार डॉक्टरांना आता कोणीही रोखू शकत नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांबाबत केंद्र शासनास समिती नेमून उपाययोजना करण्यास सांगितले होते. या आदेशास अनुसरून ४ जानेवारी २०२५ रोजी  न्यायालयास अहवाल सादर केला. सदर समिती शिफारशीनुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास नीट, पीजीच्या पात्रतेची अट काढून टाकली व नीट, पीजीमध्ये शून्य गुण मिळाले तरी त्या विद्यार्थ्यांना एमडी/ एमएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला आहे. असाच प्रकार आता केंद्र शासनास सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाच्या १ हजारपेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एमबीबीएसच्या या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरnirmala sitharamanनिर्मला सीतारामन