शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

७० टक्के घर खरेदीदार करणार बिल्डरची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:49 AM

घर मिळण्यास विलंब : सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती

नवी दिल्ली : घरे विकत घेणारे दोनतृतीयांश लोक रेरा कायद्यांतर्गत बिल्डरविरोधात तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. बिल्डरने ठराविक काळात या लोकांना घराचा ताबा दिला नसल्याने ग्राहक या निर्णयाप्रत आले आहेत. रिअल इस्टेटबाबतची माहिती पुरविणाऱ्या मॅजिकब्रिक्सच्या सर्वेक्षणातून ही माहिती आली आहे.

आतापर्यंत २२ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांत रेराची अंमलबजावणी झाली आहे. पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे जिथे त्या राज्याचा वेगळा कायदा आहे. घरे खरेदी करणाऱ्यांपैकी ७२ टक्के लोक रेराअंतर्गत तक्रार दाखल करू इच्छितात, तर १९ टक्के लोकांना आपली रक्कम परत हवी आहे. केवळ १० टक्के लोक घराचा ताबा मिळण्यासाठी प्रतीक्षा करण्यास तयार आहेत, असेही या पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे.

रेरा कायदा मे २०१७ मध्ये लागू झाला होता. यामुळे ग्राहकांना आशेचा किरण दिसून आला. बिल्डरकडून दिलेला शब्द पाळण्यात आला नाही, तर त्याची तक्रार ग्राहकाला याअंतर्गत करता येते. या पोर्टलवर असेही म्हटले आहे की, या कायद्यामुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला.

बिल्डर रक्कम जप्त करू शकत नाहीबिल्डरकडून घराचा ताबा देण्यास उशीर होत असल्याने ग्राहकाने घरखरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर बिल्डर त्या ग्राहकाने दिलेली आगाऊ रक्कम जप्त करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ग्राहक आयोगाने व्यक्त केले आहे. नॉयडातील प्रकरणात ग्राहकाची एक कोटीपेक्षा अधिकची रक्कम परत करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.