शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
5
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
6
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
7
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
8
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
9
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
11
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
12
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
13
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
14
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
15
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
16
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
17
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
18
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
19
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
20
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत

'देशातील ७० टक्के लोकांना वाटतंय, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 22:48 IST

युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्मच्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांनीही मोदींच्या कामाचं कौतुक करत, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील ७० टक्के लोकांची इच्छा असल्याचा दावाच केला आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ सरकारचा कार्यकाळच पूर्ण करणार नसून पुढील पंतप्रधानही तेच असावेत, अशी लोकांची भावना असल्याचे येदीयुरप्पा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आर्टीकल ३७० रद्द करत मोदींनी लोहपुरुष असल्याचं सिद्ध केलंय, असेही ते म्हणाले.

युवा देश असलेल्या भारताची इच्छा ही नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, अशी आहे. देशातील सद्यस्थितीच्य समस्यांचे निराकरण मोदीच चांगल्याप्रकारे करतील, असा विश्वास तरुणाईला आहे. मोदींनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष पूर्ण केलं असून देश त्यांच्या नेतृत्वात प्रगतीपथावर आहे.  सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हा नारा देत मोदींनी देशाला विकासाचा मार्ग दाखवला आहे. मजबूत आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मोदींचा प्रयत्न सुरु आहे. मोदींनी दिलेल्या‘वसुधैव कुटुम्बकम' या मंत्रामुळे न केवळ भारतात, याउलट जगभरात मोदींच्या नेतृत्वाची ओळख निर्माण झाली आहे. 

मोदींनी, तीन तलाक कायदा, वंदे भारत मिशन, नागरिकता संशोधन कायदा, एक देश एक रेशनकार्ड, नवीन मोटारवाहन कायदे, राममंदिर वादावर तोडगा हे सर्व भाजपाची उपलब्धता असल्याचंही येदीयुरप्पा यांनी म्हटलं. कोरोना संकटाच्या काळातही १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने मजबूतीने लढा दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYeddyurappaयेडियुरप्पाprime ministerपंतप्रधानKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्री