शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

देशात गतवर्षी ७ टक्के बलात्कार अन् १0 टक्के गँगरेप घटले!

By admin | Updated: September 3, 2016 02:59 IST

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी प्रकरणांची देशव्यापी आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, वर्षभरात बलात्काराच्या संख्येत देशात ७ टक्क्यांची तर गँगरेप प्रकरणात १0 टक्क्यांची घट झाली आहे. ३६ पैकी १५ राज्यात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण बऱ्यापैकी घटले आहे. महाराष्ट्रात मात्र २0१५ साली दुर्देवाने बलात्कारांची संख्या वाढली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ व २0१५ अशा दोन वर्षांच्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या आकडेवारीचा तक्ता अहवालात सादर केला आहे. २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले तर २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ पर्यंत खाली आली. २0१५ सालीही देशात बलात्काराच्या घटनांमधे मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे मात्र २0१४ च्या तुलनेत तिथे बलात्काराच्या संख्येत १३.४९ टक्क्यांची घट झाली आहे. देशात बलात्कारांमधे सर्वाधिक घट सिक्कीम ८९ टक्के, तामिळनाडू ६२ टक्के, कर्नाटक ५५.५ टक्के, मिझोरम ५१.६ टक्के व गुजराथ ४0 टक्के नोंदवली गेली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधे लक्षव्दिप हा एकमेव प्रदेश असा आहे की जिथे बलात्काराचा एकही गुन्हा घडल्याची नोंद नाही. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश आघाडीवर; हुंडाबळी, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र घटलीदेशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची एकुण ३ लाख २७ हजारांहून अधिक प्रकरणे गतवर्षी नोंदवली गेली. त्यात १ लाख ३0 हजार गुन्हे हे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. तथापि अहवालानुसार २0१४ च्या तुलनेत ही संख्या ३ टक्क्यांनी खाली आली आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तरप्रदेशात आघाडीवर असून या राज्यात ३५ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली तर राजस्थान २८ हजार १६५ घटनांसह ४ थ्या क्रमांकावर आहे.अहवालानुसार चिंताजनक बाब अशी की २0१५ साली देशात ५९ हजार २७७ महिलांचे अपहरण झाले. त्यापैकी ३१ हजार ८८४ महिलांचे अपहरण केवळ विवाहासाठी झाले. २0१४ साली महिलांची छेडछाड करण्याच्या ८२ हजार ६२0 घटना घडल्या तर २0१५ साली त्यात थोडी वाढ होउन ही संख्या ८२ हजार ८00 वर पोहोचली. याच काळात कार्यालयीन छेडछाडीची प्रकरणे ६0 वरून ११९ पर्यंत वाढली. २0१४ साली बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या ४ हजार २३४ घटनांची नोंद होती तर २0१५ याच घटनांची संख्या ४ हजार ४३७ वर गेली. २0१४ साली महिलांवर कौटुंबिक हिंसा व अत्याचाराची ४३0 प्रकरणे नोंदवली गेली तर २0१५ साली अशा गुन्ह्यांची संख्या ४६८ झाली आहे. हुंडाबळी, पती व सासरच्या मंडळीकडून हिंसा, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र पूर्वीपेक्षा घटली आहे. देशात बलात्कारांची पहिल्या ५ राज्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.बलात्कारित महिलांची सर्वाधिक संख्या १६ ते ३0 वयोगटातली आहे. सर्वात घृणास्पद बाब म्हणजे १६0२ बलात्काराच्या पीडित फक्त ६ ते १२ वयाच्या लहान मुली आहेत. बलात्काराचे ९५.५ टक्के संशयित आरोपी पीडित महिलेचे परिचित अथवा आप्तस्वकिय आहेत.