शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देशात गतवर्षी ७ टक्के बलात्कार अन् १0 टक्के गँगरेप घटले!

By admin | Updated: September 3, 2016 02:59 IST

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी प्रकरणांची देशव्यापी आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, वर्षभरात बलात्काराच्या संख्येत देशात ७ टक्क्यांची तर गँगरेप प्रकरणात १0 टक्क्यांची घट झाली आहे. ३६ पैकी १५ राज्यात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण बऱ्यापैकी घटले आहे. महाराष्ट्रात मात्र २0१५ साली दुर्देवाने बलात्कारांची संख्या वाढली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ व २0१५ अशा दोन वर्षांच्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या आकडेवारीचा तक्ता अहवालात सादर केला आहे. २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले तर २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ पर्यंत खाली आली. २0१५ सालीही देशात बलात्काराच्या घटनांमधे मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे मात्र २0१४ च्या तुलनेत तिथे बलात्काराच्या संख्येत १३.४९ टक्क्यांची घट झाली आहे. देशात बलात्कारांमधे सर्वाधिक घट सिक्कीम ८९ टक्के, तामिळनाडू ६२ टक्के, कर्नाटक ५५.५ टक्के, मिझोरम ५१.६ टक्के व गुजराथ ४0 टक्के नोंदवली गेली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधे लक्षव्दिप हा एकमेव प्रदेश असा आहे की जिथे बलात्काराचा एकही गुन्हा घडल्याची नोंद नाही. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश आघाडीवर; हुंडाबळी, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र घटलीदेशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची एकुण ३ लाख २७ हजारांहून अधिक प्रकरणे गतवर्षी नोंदवली गेली. त्यात १ लाख ३0 हजार गुन्हे हे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. तथापि अहवालानुसार २0१४ च्या तुलनेत ही संख्या ३ टक्क्यांनी खाली आली आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तरप्रदेशात आघाडीवर असून या राज्यात ३५ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली तर राजस्थान २८ हजार १६५ घटनांसह ४ थ्या क्रमांकावर आहे.अहवालानुसार चिंताजनक बाब अशी की २0१५ साली देशात ५९ हजार २७७ महिलांचे अपहरण झाले. त्यापैकी ३१ हजार ८८४ महिलांचे अपहरण केवळ विवाहासाठी झाले. २0१४ साली महिलांची छेडछाड करण्याच्या ८२ हजार ६२0 घटना घडल्या तर २0१५ साली त्यात थोडी वाढ होउन ही संख्या ८२ हजार ८00 वर पोहोचली. याच काळात कार्यालयीन छेडछाडीची प्रकरणे ६0 वरून ११९ पर्यंत वाढली. २0१४ साली बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या ४ हजार २३४ घटनांची नोंद होती तर २0१५ याच घटनांची संख्या ४ हजार ४३७ वर गेली. २0१४ साली महिलांवर कौटुंबिक हिंसा व अत्याचाराची ४३0 प्रकरणे नोंदवली गेली तर २0१५ साली अशा गुन्ह्यांची संख्या ४६८ झाली आहे. हुंडाबळी, पती व सासरच्या मंडळीकडून हिंसा, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र पूर्वीपेक्षा घटली आहे. देशात बलात्कारांची पहिल्या ५ राज्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.बलात्कारित महिलांची सर्वाधिक संख्या १६ ते ३0 वयोगटातली आहे. सर्वात घृणास्पद बाब म्हणजे १६0२ बलात्काराच्या पीडित फक्त ६ ते १२ वयाच्या लहान मुली आहेत. बलात्काराचे ९५.५ टक्के संशयित आरोपी पीडित महिलेचे परिचित अथवा आप्तस्वकिय आहेत.