शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

६८,००० जवान, युद्ध  सामुग्री लडाखमध्ये! गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारताची चाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 05:26 IST

भारतीय हवाई दलाने एलएसीवर ६८,००० पेक्षा जास्त सैनिक, ९० रणगाडे व अन्य शस्त्र प्रणालीही देशभरातून तातडीने पूर्व लडाखमध्ये पोहोचवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारतीय हवाई दलाने एलएसीवर ६८,००० पेक्षा जास्त सैनिक, ९० रणगाडे व अन्य शस्त्र प्रणालीही देशभरातून तातडीने पूर्व लडाखमध्ये पोहोचवली होती. संरक्षण व सुरक्षा प्रतिष्ठानच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.

मागील काही दशकांत दोन्ही देशांमध्ये १५ जून २०२०चा सर्वांत गंभीर सैन्य संघर्ष होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने लढाऊ विमानांच्या अनेक स्क्वाड्रन तयार स्थिती ठेवण्याबरोबरच शत्रूच्या जमवाजमवीवर २४ तास निगराणी व गुप्त माहिती जमा करण्यासाठी आपली एसयू-३० एमकेआय व जग्वार लढाऊ विमाने तैनात केली होती.

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी या भागात मोठ्या संख्येने रिमोट संचालित विमानेही (आरपीए) तैनात केली होती. हवाई दलाच्या विमानांनी भारतीय लष्कराच्या अनेक डिव्हीजनला एअरलिफ्ट केले होते. यात ६८,००० पेक्षा अधिक सैनिक, ९० पेक्षा जास्त रणगाडे, पायदळ, ३३० लढाऊ वाहने, रडार प्रणाली, तोफा व अन्य सामग्रीचा समावेश आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर लष्कराने आपल्या लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

हवाई दलाच्या सर्व मोहिमांचे लक्ष्य पूर्ण

- सूत्रांनी भारताच्या समग्र दृष्टिकोनाचा उल्लेख करीत म्हटले आहे की, रणनीती सैन्य स्थिती मजबूत करणे, विश्वसनीय सैन्य दलांना कायम ठेवणे व कोणत्याही स्थितीत प्रभावी पद्धतीने निपटण्यासाठी शत्रूच्या सैन्य जमवाजमवीवर लक्ष ठेवण्याचे होते. - सूत्रांनी अधिक तपशील न देता सांगितले की, हवाई दलाने अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले व सर्व मोहिमांचे लक्ष्य पूर्ण केले.

युद्धाचीही तयारी...

- हवाई दलाच्या परिवहन ताफ्याने एकूण ९,००० टन वाहतूक केली होती व ही बाब हवाई दलाची वाढती रणनीती, एअरलिफ्ट क्षमता दर्शवते.

- यामध्ये सी-१३०जे सुपर हर्क्युलस व सी-१७ ग्लोबमास्टर विमानांचाही समावेश होता.

- राफेल व मिग-२९ विमानांसह मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात केली होती. एलएसीच्या आघाडीच्या ठिकाणांवर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रांची तैनाती करून  युद्धाची तयारी वेगाने वाढवली होती.

एअरलिफ्ट क्षमता वाढवली : ऑपरेशन पराक्रमच्या कालावधीतील तुलनेत समग्र ऑपरेशनने भारतीय हवाई दलाची वाढती एअरलिफ्ट क्षमता दाखवली आहे. डिसेंबर २००१मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन पराक्रम सुरू केले होते. हवाई दलाने शस्त्रेही पोहोचवली होती; ९० रणगाडे ३३० लढाऊ वाहने, रडार प्रणाली, तोफा व अन्य सामग्रीचा समावेश. एसयू-३० एमकेआय व जग्वार, लढाऊ विमानेही केली होती तैनात. १५ जून २०२० रोजी दोन्ही देशांत सर्वांत गंभीर सैन्य संघर्ष.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख