शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

 तीन कंपन्यांतील हिस्सेदारी विकून ६५ हजार कोटी रुपये उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:36 IST

केंद्र सरकारचे प्रयत्न : पीएफसी, एनएमडीसी व सेल यांच्यापासून सुरुवात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचा भाग म्हणून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी), नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) व स्टील आॅथोरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (सेल) या कंपन्यांतील आपला हिस्सा विकून ६५ हजार कोटी रुपये उभारण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

या तीन सरकारी कंपन्यांतील आपली हिस्सेदारी विकून १.५ लाख कोटी उभे राहतील, असा सरकारचा अंदाज होता. पण केंद्रीय अर्थसंकल्पात या कंपन्यांतील हिस्सा विकून ६५ हजार कोटी रुपये मिळतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. एकूणच अनेक सरकारी कंपन्यांतील आपला हिस्सा विकण्याचे केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यातील काही कंपन्या तोट्यात वा कर्जाच्या बोज्याखाली आहेत, तर काही सुस्थितीत असल्या तरी त्या सरकारने चालवू नये, असा मतप्रवाह आहे.

याखेरीज कोल इंडियातील हिस्सा विकून १ हजार कोटी रुपये मिळतील, असा सरकारचा अंदाज आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी)मधील हिस्सेदारी विकून १५०० कोटी रुपये मिळू शकतील, असे गृहीत धरण्यात आले आहे.लार्सन अँड टूब्रो तसेच आयटीसीमध्येही सरकारचे काही भांडवल आहे. ते विकूनही पैसे उभे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

या दोन कंपन्या तसेच स्पेसिफाइड अंडरटेकिंग आॅफ युनिट ट्रस्ट आॅफ इंडिया (एसयूयूटीआय) मार्फत अ‍ॅक्सिस बँकेत असलेल्या हिस्सेदारीतून ६५ हजार कोटी रुपये येतील, अशी अपेक्षा असून, त्यापैकी काही भाग विकून ३५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण?भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), कंटेनर कॉर्पोरशन (कॉनकॉर्न) व शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियातील हिस्सेदारी विकण्याचाही निर्णय आधीच झाला आहे. पण ती प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षात होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्चपर्यंत पीएफसी, एनएमडीसी व सेलमधून ६५ हजार कोटी रुपये मिळावेत, असा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी