शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:59 IST

आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धाराली आणि हर्षिल गावात निसर्गाने केलेल्या कहरानंतर, लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी दोन्ही ठिकाणी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

अजूनही सुमारे ३०० लोक यात अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथके त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या कामात गुंतली असून, शोध आणि बचाव कार्यासाठी श्वान पथके, ड्रोन आणि भूमिगत रडारचा वापर केला जात आहे. हर्षिल खोऱ्यात मोबाईल कम्युनिकेशन सिस्टम पूर्ववत करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी गेल्या तीन दिवसांपासून उत्तरकाशीमध्ये आहेत.

मुख्यमंत्री धामी काय म्हणाले?मुख्यमंत्री धामी हे धरालीमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी ४५० आणि शुक्रवारी २५० लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे सीएम धामी यांनी सांगितले. अडकलेल्या उर्वरित लोकांना लवकरच सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबतही त्यांनी सांगितले. एसडीआरएफने माहिती देताना म्हटले की, नऊ सैनिक आणि इतर सात लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्याच वेळी, स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की बेपत्ता लोकांची संख्या जास्त असू शकते.

यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी

धरालीमध्ये अनेक हॉटेल्स बांधली जात होती. बिहार आणि नेपाळमधील कामगार हॉटेल्सच्या बांधकामात गुंतले होते. हॉटेल्समध्ये दोन डझनहून अधिक लोक होते. त्यापैकी बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत. कोणताही पत्ता लागलेला नाही. धराली, हर्षिल आणि उत्तरकाशी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत. यामुळे मदत आणि बचाव कार्य करण्यात अडचणी येत आहेत.

मात्र, आता मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्यामुळे बचाव कार्याला वेग येईल अशी अपेक्षा आहे. बाधित भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केली जात आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडfloodपूर