शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 05:48 IST

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले.

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी १०वी व १२वीच्या परीक्षेत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे केंद्रीय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालयांतून मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक संख्येने बारावीची परीक्षा दिली. मात्र, याच्या अगदी उलट चित्र खासगी शाळा किंवा सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये होते. गेल्या वर्षी इयत्ता दहावीतील ३३.५ लाख विद्यार्थी पुढच्या इयत्तेत पोहोचले नाहीत. ५.५ लाख विद्यार्थी १०वीच्या परीक्षेला बसले नाहीत तर २८ लाख विद्यार्थी नापास झाले. 

त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ३३.५ लाख विद्यार्थी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यातील ५.५ लाख विद्यार्थी परीक्षेलाच बसले नाहीत तर २८ लाख जण परीक्षेत नापास झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दहावी नापासांत मध्य प्रदेश पहिला दहावीत अपयश आलेले सर्वाधिक विद्यार्थी मध्य प्रदेशात, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशचा क्रमांक. बारावीत नापासांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात.  त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण