शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 05:48 IST

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले.

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी १०वी व १२वीच्या परीक्षेत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे केंद्रीय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालयांतून मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक संख्येने बारावीची परीक्षा दिली. मात्र, याच्या अगदी उलट चित्र खासगी शाळा किंवा सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये होते. गेल्या वर्षी इयत्ता दहावीतील ३३.५ लाख विद्यार्थी पुढच्या इयत्तेत पोहोचले नाहीत. ५.५ लाख विद्यार्थी १०वीच्या परीक्षेला बसले नाहीत तर २८ लाख विद्यार्थी नापास झाले. 

त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ३३.५ लाख विद्यार्थी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यातील ५.५ लाख विद्यार्थी परीक्षेलाच बसले नाहीत तर २८ लाख जण परीक्षेत नापास झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दहावी नापासांत मध्य प्रदेश पहिला दहावीत अपयश आलेले सर्वाधिक विद्यार्थी मध्य प्रदेशात, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशचा क्रमांक. बारावीत नापासांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात.  त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण