शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणावर दरवर्षी ६.५ लाख कोटींचा खर्च- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:27 IST

सहकारी संस्थांनी राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे

नवी दिल्ली : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनावरून काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करते. 

‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’ निमित्त आयोजित ‘भारतीय सहकारी काँग्रेस’ कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, सहकारी संस्थांनी राजकारण न करता सामाजिक आणि राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे मॉडेल बनून डिजिटल माध्यमांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर ही मोदींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकार इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात खतांचा पुरवठा करत आहे. किमान आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी केले आहे.

खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च सरकारने गेल्या वर्षी खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांना युरियाची एक पिशवी २७० रुपयांना मिळत आहे आणि ही किंमत बांगलादेश (७२० रुपये), पाकिस्तान (८०० रुपये), चीन (२१०० रुपये) आणि अमेरिका (३००० रुपये) पेक्षा खूपच कमी असल्याचे मोदींनी नमूद केले. 

‘ही मोदींची हमी’पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सुमारे ५०,००० रुपये या ना त्या मार्गाने मिळतील यासाठी सरकार पावले उचलत आहे. ही मोदींची हमी आहे आणि मी जे केले ते सांगत आहे, आश्वासने देत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी