शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Accident News : शेतमजूरांच्या पीकअप वाहनाचा भीषण अपघात, 6 ठार 23 जखमी

By महेश गलांडे | Published: October 06, 2020 10:29 AM

Accident News : सोयाबीन कापणीच्या कामासाठी केसून येथे गेले होते, आपले काम झाल्यानंतर रहिवाशी ठिकाण असलेल्या टांडा येथे परतत असताना या शेतमजूरांच्या पीकअप गाडीचे चाक पंक्चर झाले.

धार - मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात तिरला ठाणे हद्दीतील इंदूर-अहमदाबाद मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 6 शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री 12.30 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेते जवळपास 23 मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोयाबीन कापणीच्या कामासाठी केसून येथे गेले होते, आपले काम झाल्यानंतर रहिवाशी ठिकाण असलेल्या टांडा येथे परतत असताना या शेतमजूरांच्या पीकअप गाडीचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे, ड्रायव्हर आणि काही मजूरांनी गाडीतून बाहेर उतरुन टायर बदलण्याचे काम हाती घेतले होते. यादरम्यान, एका टँकरने पीकअप वाहनाला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक मजूर पीकअपमधून उडून बाहेर पडले. या पीकअपमधून महिला व लहान मुलेही प्रवास करत होती. 

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन, गावकरी व रुग्णवाहिकांच्या मदतीने मृतांना व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तर, गंभीर जखमींना इंदूरमधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, 4 जणांनी रुग्णालयातच आपला जीव सोडला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन महिला व दोन 10 ते 12 वर्षीय लहान मुलांचा समावेश आहे. 

जिल्हा पोलीस प्रशासनाने या अपघाताची माहिती दिली असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचेही म्हटले.   

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशindore-pcइंदौरPoliceपोलिस