शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 20:26 IST

आसाम-मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे एकमेकांवर आरोप; अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

गुवाहाटी: आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमा वाद तापला आहे. आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या गोळीबारात आसामच्या ६ पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. यामुळे सीमा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. गृहमंत्री अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  'आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचं रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे ६ शूर पोलीस शहीद झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होतंय. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांच्या सोबत आहेत,' असं मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील तणाव वाढला असताना ६ पोलिसांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यानं सीमा प्रश्न आणखी हिंसक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आसाम-मिझोरामच्या सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरलं. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला.

टॅग्स :AssamआसामAmit Shahअमित शहा