शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:32 IST

Corona Virus in Maharashtra: महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

देशात कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. मात्र, महाराष्ट्रात देशाच्या निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित सापडू (Corona patient incresed in Maharashtra.) लागल्याने आता केंद्र विरोधात राज्य सरकार असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. पुणे, ठाण्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याचे वृत्त आले होते. या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javdekar) यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) मोठा आरोप लावला आहे. (Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. )

महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 44 टक्केच लसीचे लसीकरण झाले आहे. तर 56 टक्के लस पडून कशी राहिली असा सवाल केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने12 मार्चपर्यंत 23 लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण 54 लाख लसी देण्यात आल्या होत्या.  याचाच अर्थ 56 टक्के लसींचा साठा वापरलाच नाहीय, असा आरोप केला आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस शिल्लक असताना शिवसेनेचे खासदार राज्याला आणखी अतिरिक्त लस हवी अशी मागणी करत आहेत. आधी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी गडबड-गोंधळ केला आता लसीकरणामध्येही तेच घडत आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

मंगळवारीच केंद्राने झापलेले... महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे.

१२,७४,००० डोस मिळणार -महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस