शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:24 IST

कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवल्यानंतर ३७ मुलांसह एकूण ५१ लोक अन्नातून विषबाधा झाल्यामुळे गंभीर आजारी पडले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या सर्व लोकांना कोरबा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

गुरुवारी रात्री उरगा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पहारीपारा गावात एका लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे जेवल्यानंतर काही पाहुण्यांना उलट्या आणि जुलाब झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल कंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १४ मुली, २३ मुलं, ११ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा होण्याचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही आणि तपास सुरू आहे.

जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील रामगढी गावातील रसूलपूर चांसी गावात लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या लोकांची तब्येत रात्री अचानक बिघडली. सुमारे ४० जणांना उलट्या आणि त्रास झाला, त्यापैकी २० रुग्णांना जहांगीराबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, तर इतरांवर गावात उभारलेल्या आरोग्य शिबिरात उपचार करण्यात आले. मदतीसाठी १८ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाChhattisgarhछत्तीसगडmarriageलग्न