शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

माल्ल्या, नीरव मोदींसह 51 जण फरार; देशाला 17,900 कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 13:24 IST

अर्थ राज्यमंत्र्यांची राज्यसभेत महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई: विजय माल्ल्या, नीरव मोदी बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्यानं मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील एकूण ५१ जण बँकांना चुना लावून फरार झाल्याची माहिती मोदी सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे. देशाबाहेर पळून गेलेल्या ५१ जणांनी १७,९०० कोटींची फसवणूक केली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत केंद्रीय तपास यंत्रणेच्या अहवालाचा संदर्भ देत देश सोडून पळून गेलेल्यांची माहिती दिली. फसवणुकीच्या ६६ प्रकरणांमध्ये ५१ फरार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. देश सोडून परांगदा झालेल्या आरोपींनी एकूण १७,९४७.११ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयनं न्यायालयांमध्ये आरोपपत्रं दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. देश सोडून पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरू आहेत.  केंदीय अप्रत्यक्ष कर विभाग आणि सीमा शुल्क विभागानं आर्थिक अपहार करुन पळून गेलेल्या सहा आरोपींबद्दलचा अहवाल दिला असल्याचं ते म्हणाले. अंमलबजावणी संचलनालयानं १० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केली असून त्यापैकी आठ आरोपींविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीसदेधील जारी केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याNarendra Modiनरेंद्र मोदी