शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

माल्ल्या, नीरव मोदींसह 51 जण फरार; देशाला 17,900 कोटींचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 13:24 IST

अर्थ राज्यमंत्र्यांची राज्यसभेत महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई: विजय माल्ल्या, नीरव मोदी बँकांची फसवणूक करुन देश सोडून फरार झाल्यानं मोदी सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या हे दोनच उद्योगपती देश सोडून गेलेले नाहीत. देशातील एकूण ५१ जण बँकांना चुना लावून फरार झाल्याची माहिती मोदी सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे. देशाबाहेर पळून गेलेल्या ५१ जणांनी १७,९०० कोटींची फसवणूक केली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत केंद्रीय तपास यंत्रणेच्या अहवालाचा संदर्भ देत देश सोडून पळून गेलेल्यांची माहिती दिली. फसवणुकीच्या ६६ प्रकरणांमध्ये ५१ फरार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. देश सोडून परांगदा झालेल्या आरोपींनी एकूण १७,९४७.११ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयनं न्यायालयांमध्ये आरोपपत्रं दाखल केली असून तपास सुरू असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. देश सोडून पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरू आहेत.  केंदीय अप्रत्यक्ष कर विभाग आणि सीमा शुल्क विभागानं आर्थिक अपहार करुन पळून गेलेल्या सहा आरोपींबद्दलचा अहवाल दिला असल्याचं ते म्हणाले. अंमलबजावणी संचलनालयानं १० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केली असून त्यापैकी आठ आरोपींविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीसदेधील जारी केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याNarendra Modiनरेंद्र मोदी