शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 06:29 IST

काश्मीरच्या त्रिभाजनाच्या अफवा : विशेष दर्जा काढण्यात येण्याचीही चर्चा

यात्रेकरू व पर्यटकांना खोरे सोडण्याच्या सूचना

नवी दिल्ली/श्रीनगर : पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोºयात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २८0 कंपन्या (२८ हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोºयाला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने २५ जुलै रोजी १0 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोºयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ६५ हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी २0 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोºयात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण अचानक इतक्या सशस्त्र पोलिसांना तिथे पाठवण्याची गरज आता का भासावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरनाथ यात्रेकरू तसेच खोºयात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोºयात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोºयात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.

 काश्मीरमध्ये इतके सशस्त्र पोलीस का पाठवण्यात येत आहेत आणि यात्रेकरू व पर्यटकांना काश्मीर खोरे सोडण्याच्या सूचना का देण्यात आल्या आहेत, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. पण त्यावेळी अन्य चर्चा सुरू असल्याने या विषयावर सरकारतर्फे काहीच उत्तर देण्यात आले नाही. अध्यक्षपदी बसलेल्या मीनाक्षी लेखी यांनी मूळ विषयावरील चर्चाच सुरू ठेवली. काहींच्या मते विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी इतके सशस्त्र पोलीस पाठवण्यात आले आहेत, तर पंतप्रधान मोदी १५ आॅगस्ट रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावणार असल्याने इतकी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.दडपण आणण्याचा केंद्राचा डाव : मेहबूबाकाश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे सारे त्रिभाजनासाठी तसेच ३५ (अ) व ३७१ कलम रद्द करण्यासाठी सुरू आहे का, असा सवालच केला आहे. त्यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीही सशस्त्र दलाच्या इतक्या तुकड्या आता पाठवण्याचे कारण काय, असे विचारले आहे. खोºयात राहणाºया जनतेमध्ये घबराट पसरवण्याचा हा केंद्राचा डाव आहे. पण काश्मिरी जनतेवर लष्करी मार्गाने दबाव वा दडपण आणण्याचे केंद्राचे प्रपत्न यशस्वी होणार नाही, असे पीडीपीच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. लोकसभेतही विरोधी सदस्यांनी हा विषय उपस्थित केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBorderसीमारेषाAmit Shahअमित शहाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती