शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

75 वर्षीय नवरदेव, 500 पाहुणे...; नवरीने नकार देताच तो म्हणाला, "गुपचूप येईन, तुला घेऊन जाईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:39 IST

वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली.

उत्तर प्रदेशच्या बांदामधील 75 वर्षांच्या वृद्धाच्या लग्नात नवा ट्विस्ट आला आहे. वरातीत जास्त माणसं आल्याने नवरी नवरदेवावर रागावली आणि तिने चक्क लग्नास नकार दिला. नवरदेवाला त्यामुळे ती वरात अर्ध्यारस्त्यातूनच परत न्यावी लागली. पण लग्नात पाहुणे जास्त असल्याने वधूने लग्नास नकार दिल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा आता वृद्धाने नवा निर्णय घेतला आहे.

नवरदेव म्हणतो की, आता तो वर गुपचूप जाईल आणि कोणाला न सांगता नवरीला घेऊन येईल. या लग्नाची बांदामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे रंजक प्रकरण नरैनी तहसीलच्या रिसौरा गावातील आहे. रविवार 22 ऑक्‍टोबर रोजी 75 वर्षीय रामसजीवन यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मोठ्या धुमधडाक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत वरात निघाली.

वरात काढण्यापूर्वी नवरदेवाने फेटा बांधला आणि मंदिरात देवाची पूजा केली. गावातील शेकडो लोक लग्नातील पाहुणे म्हणून हमीरपूरला जात होते. कारण वधू हमीरपूरची आहे. ढोल-ताशांच्या तालावर घरातील व परिसरातील तरुणाई जोमाने नाचली. पण तेवढ्यात अचानक नवरदेवाला एक फोन आला. या कॉलनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

वधूने नवरदेवाला नकार दिला. त्यानंतर वराला लग्नाची वरात परत नेण्यास भाग पाडण्यात आले. रामसजीवनने सांगितलं की, तो अजूनही वधूशी बोलतो. आमच्या घरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांची संख्या जास्त असल्याने वधूने लग्नाला नकार दिला होता. वधूने सांगितलं की, ती लग्नात इतक्या मोठ्या पाहुण्यांचे स्वागत करू शकत नाही.

हे ऐकून खूप दुःख झाल्याचे वराने सांगितलं. पण तरीही मी माझ्या वधूशी बोलतो. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण यावेळी आम्ही कोणालाही सांगणार नाही. आम्ही रात्रभर फोनवरही बोलत असतो. तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की कधी कधी मलाच फोन डिस्कनेक्ट करावा लागतो. कारण ती फोन डिस्कनेक्ट करत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश