शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

५०० मठ अन् मुख्यमंत्रिपद;कर्नाटकात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 09:18 IST

मुख्यमंत्रिपद कोणत्या समुदायाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा बुधवारी जाहीर झाल्या. विधानसभेच्या एकूण २२४ जागा असलेल्या राज्यात बहुमताचा ११३ हा आकडा गाठण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या तीन राजकीय पक्षांमध्ये प्रमुख लढत आहे. येथील राजकारण आणि समाजकारणात लिंगायत, वोक्कालिगा आणि कुरबा या समुदायांच्या वरचष्मा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद कोणत्या समुदायाकडे जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

ध्रुवीकरण कोणाच्या बाजूने? 

मतदारांमध्ये एकूण हिंदू ८४%, तर मुस्लीम १३% इतके आहेत. २०० मतदारसंघात हिंदू मतदारांची भूमिका निर्णायक असते. ऐन निवडणुकीआधी २४ मार्च रोजी बोम्मई सरकारने ओबीसी मुस्लीम समाजाला दिलेले ४% आरक्षण रद्द करून वोक्कालिगा समाजाचे कोटा ४%वरून ६% तर वीरशैव आणि लिंगायतांचा कोटा ५%वरून ७% इतका केला. यामुळे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. २२४ जागांपैकी ९० ते १०० मतदारसंघांत यांची मते प्रभावशाली ठरतात.

  • लिंगायतांच्या लहान-मोठ्या ५०० हून अधिक मठांची समाजावर घट्ट पकड
  • आजवर २२ मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातील ८ मुख्यमंत्री लिंगायत समाजाचे होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदुरप्पा हे या समाजाचे प्रमुख नेते आहेत. 
  • या निवडणुकीत प्रचाराची प्रमुख जबाबदारी भाजपने ८० वर्षे वयाच्या येदुरप्पा यांच्यावरच सोपविली आहे. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही लिंगायत आहेत.

​​​​​​​मिळालेली मते?    %मध्ये

भाजप    १३२६८२८४    ३६.२२%बसप    १०८५९२    ०.३०सीपीआय    ४८७१    ०.०१%सीपीएम    ८११९१    ०.२२%    काँग्रेस    १३९३२५३१    ३८.०४%    राष्ट्रवादी    १०४६५    ०.०३

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणElectionनिवडणूक