शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

गो-फर्स्टच्या ५०० वैमानिकांचे पगार न मिळाल्याने राजीनामे, उरले फक्त १०० वैमानिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 05:50 IST

कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती, पुन्हा उड्डाणाच्या प्रयत्नांना खीळ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक गर्तेत गेल्यामुळे २ मे पासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती लागली असून कंपनीच्या ताफ्यातील ६०० पैकी ५०० वैमानिकांनीराजीनामा दिल्याची माहिती आहे. हे ५०० कर्मचारी अन्य विमान कंपन्यांमध्ये रुजू होणार आहेत. मे महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.

केवळ वैमानिकच नव्हे तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील राजीनामाअस्त्र उगारल्यामुळे लवकरच पुन्हा विमान उड्डाण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, नोकरी सोडण्यामध्ये वैमानिक, केबिन कर्मचारी, विमानाची देखभाल करणारे इंजिनीयर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जुलैपूर्वी कंपनीच्या ताफ्यामध्ये एकूण ४२०० कर्मचारी होते. यापैकी १२०० कर्मचाऱ्यांनी जुलै महिन्यात नोकरी सोडली. त्यानंतर आता ५०० वैमानिक नोकरी सोडणार असून, यामुळे कंपनीच्या ताफ्यात अत्यंत कमी कर्मचारी उरतील. १० मे रोजी कंपनीच्या दिवाळखोरीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह

  • प्रशासकाने कंपनीच्या पुनर्रज्जीवनासाठी नागरी विमान महासंचालनालयाकडे योजना सादर केली होती. त्याला अटी व शर्तींसह मंजुरी मिळाली होती. 
  • कंपनीच्या ताफ्यातील १५ विमानांच्या माध्यमातून ११४ फेऱ्या कंपनी करणार आहे. परंतु, आता कर्मचारी गळती लागल्यामुळे कंपनीची सेवा सुरू होण्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टॅग्स :airplaneविमानpilotवैमानिकResignationराजीनामा