शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

500 व 1 हजारच्या जुन्या नोटा बदलून देणार नाही- केंद्र सरकार

By admin | Published: July 17, 2017 10:19 PM

आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ शकत नाही, असं स्पष्ट करत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ शकत नाही, असं स्पष्ट करत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं जुन्या नोटा बदलून देण्यासाठी केलेल्या सूचनेला केंद्रानं विरोध दर्शवला आहे. 500 आणि 1 हजारच्या जुन्या नोटा बदलून दिल्यास काळ्या पैशांवर अंकुश ठेवण्याचं आमचं ध्येय साध्य होणार नाही, असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. जुन्या नोटा बदलून दिल्यास बेहिशेबी व्यवहार आणि दुस-या व्यक्तीमार्फत नोटा जमा करण्याच्या प्रकारांना ऊत येईल. त्यामुळे काळा पैसा शोधणं सरकारला कठीण जाईल, असंही केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलं आहे. 1978 साली नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यावेळी नोटा बदलून देण्यासाठी फक्त 6 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र आम्ही नोटा बदलून देण्यासाठी सर्वाधिक म्हणजेच 51 दिवसांची वेळ दिली होती. तसेच नोटाबंदीच्या दरम्यान पेट्रोल पंप, रेल्वे, एअरलाइन्स तिकीट बुकिंगसाठीही मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा वापरण्यात आल्या होत्या, अशी माहिती केंद्र सरकार म्हणालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. त्यावेळी जुन्या नोटा जमा करू न शकलेल्यांसाठी एखादी खास सुविधा का उभारण्यात आली नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला विचारला होता. जे लोक एखाद्या कारणास्तव नोटा बँकेत जमा करू शकले नाहीत, त्यांची संपत्ती काढून घेण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही असंही न्यायालयाने ठणकावून सांगितलं होतं. सोबतच ज्या लोकांकडे पैसे जमा न करण्याचा वैध कारण आहे, त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.आणखी वाचा(१ लाख बोगस कंपन्यांची नोंदणी नोटाबंदीनंतर रद्द)(नोटाबंदीनंतर आलेल्या ८३% नव्या नोटा चलनात)एका महिलेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, ज्यांच्याकडे वैध कारण आहे त्यांना अजून एक संधी देण्यात आली नाही तर हा गंभीर मुद्दा ग्राह्य धरला जाईल. नोटाबंदी सुरू असताना एखादी व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असेल, तर तो कसा काय नोटा बँकेत जमा करू शकत होता ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. अशा परिस्थितीत सरकारने अशा लोकांसाठी एखादी विशेष सुविधा सुरू करायला हवी असं मत न्यायालयाने व्यक्त केलं होतं.