शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

केंद्र सरकारकडून आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यास ५० लाखांचं विमा कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 19:39 IST

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असलेल्यांचा पीएफ कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग सरकार भरत होते. आता, पुढील तीन महिने १२-१२ टक्के भाग सरकारच भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची विस्तृत माहितीही सितारमण यांनी दिली. त्यामध्येच, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकजेचा समावेश आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवस-रात्र काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने, प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पंतप्रधान अन्न योजना, पंतप्रधान कसान सन्मान निधी यासह अन्य माध्यमातून शेतकरी आणि गरिबांना मदत केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्यातून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मदत करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या योजनेतून देशातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. तर, देशातील ८० कोटी गरीब नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून ५ किलो गहू, तांदुळ पुढील तीन महिन्यासाठी अत्यल्प दराने देण्यात आला आहे. तर, एक किलो तूरदाळही मोफत देण्यात येणार आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून २० कोटी महिलांना ५०० रुपये प्रतिमाह, असे पुढील ३ महिन्यासाठी देण्यात येत आहेत. तसेच, देशातील ८ कोटी कुटुंबीयांना पुढील तीन महिन्यांसाठी गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे. त्याचबरोबर, मनरेगा योजनेवर काम करणाऱ्या कामगारांना १८२ ऐवजी २०२ रुपये प्रतिदिन वेतन मिळणार आहे. तर, देशातील गरीब ज्येष्ठ नागरिकांना, विधवा महिलांना आणि दिव्यांग नागरिकांना १ हजार अधिकचा भत्ता देण्यात येणार आहे.   

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची विस्तृत माहिती दिली. त्यानुसार, गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५,००० पेक्षा कमी पगार असेल्यांनाही पीएफ काढता येणार आहे. तसेच १२ टक्के कंपनी आणि १२ टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सरकार आणखी तीन महिने पीएफ भरणार आहे. यासाठी ७२.२ लाख कर्मचाऱ्यांचा जून, जुलै, ऑगस्टचा पीएफ जमा केला जाणार आहे. यासाठी २५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे सीतारामन यांनी सांगितले. 

पुढील तीन महिन्यांसाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे पीएफ भाग आधी १२-१२ टक्के होता. तो आता १०-१० टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनाही हातात पैसे हवे आहेत. तसेच कंपन्यांनाही पैसे हवे आहेत. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांकडे ६५०० कोटींचे भांडवल खेळते राहील. यातून सरकारी कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनprime ministerपंतप्रधानHealthआरोग्यdoctorडॉक्टर