शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अभिमानास्पद! ७५ उंबऱ्याच्या गावात ५० आयएएस, आयपीएस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 09:27 IST

गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अधिकारी इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त असतात. दरवर्षी एक हजारपेक्षा कमी रिक्त जागांसाठी जवळपास १० लाख उमेदवार ही यूपीएससी ही अवघड परीक्षा देतात. उत्तर प्रदेशमध्ये माधोपट्टी (जिल्हा जौनपूर) हे लहानसे गाव. त्याची ओळख आयएएस आणि आयपीएस गाव अशीच आहे. 

माधोपट्टी गावात ७५ घरे असून जवळपास प्रत्येक घरात आयएएस किंवा आयपीएस केडरचा एक सदस्य आहे. या गावात एकूण घरे ७५ पण येथे अधिकाऱ्यांची संख्या ५० पेक्षा जास्त. या गावातील मुले व मुलीच नाही तर सुनादेखील अधिकाऱ्याचे पद सांभाळत आहेत. माधोपट्टी गावाची तुलना गाजीपूरच्या गहमर गावाशी केली जाऊ शकते. माधोपट्टी गावात अनेक लोकांनी नागरी सेवांमध्ये आपले करिअर केले. गावातील काही युवकांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भाभा अणुशक्ती केंद्रातही  यशस्वी करिअर केले आहे. या गावात चार भावांची निवड आयएएससाठी झाल्याचा विक्रमही आहे.

परंपरा...

- १९५५ मध्ये नागरी सेवा उत्तीर्ण केलेले विनय कुमार सिंह हे बिहारचे मुख्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले. 

- विनय कुमार सिंह यांचे दोन भाऊ छत्रपाल सिंह आणि अजय कुमार सिंह यांनी १९६४ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली.

- चौथे बंधू शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस बनले. छत्रपाल सिंह तमिळनाडूचे मुख्य सचिव होते. 

- माधोपट्टी गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही. गावात रस्त्यांवर खड्डे आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश