शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 07:29 IST

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले.

इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा वाढत असलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ५० अतिरिक्त कंपनी म्हणजे ५ हजारांहून अधिक जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जिरिबाम जिल्ह्यात मालमत्तेची नासधूस करणारा जमाव व जवानांची चकमक सुरू असताना गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. मणिपूरमधील विद्यमान स्थिती तसेच तेथे तैनात करण्यात आलेली सुरक्षा दले यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सलग दुसऱ्या दिवशी आढावा घेतला.

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच रविवारी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या महिला व मुलांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलक बाबुपुरा येथे मालमत्तेची नासधूस करत असताना सुरक्षा दलाशी त्यांची चकमक झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. हा गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृताचे नाव के अथौबा असे असून, त्याचे वय २० वर्षांचे होते.

काँग्रेस आणि भाजपची कार्यालये व जिरिबामच्या अपक्ष आमदाराच्या घरांची रविवारी रात्री नासधूस करण्यात आली. जिरिबाम जिल्ह्यात १२ नोव्हेंबरला हिंसाचार घडल्यानंतर सीएपीएफच्या २०, सीआरपीएफच्या १५ व बीएसएफच्या ५ कंपन्या मणिपूरला रवाना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र वाढता हिंसाचार लक्षात घेता अतिरिक्त ५० कंपन्या तैनात करण्याचे ठरविले आहे. 

जिरिबाममध्ये निदर्शकांनी सरकारी कार्यालयांना लावले कुलूप 

जिरिबाममध्ये तीन महिला आणि तीन मुलांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ कोऑर्डीनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटीच्या (कोकोमी) सदस्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शकांनी संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून सोमवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मणिपूरमधील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट बुधवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिरिबाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या निषेधार्थ आंदोलक लम्फेलपत येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकुलात घुसले आणि त्यांनी तेथील मुख्य प्रवेशद्वार साखळ्या कुलूप लावून बंद केले. टाक्येल येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यालयाच्या तसेच आणखी एका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंदोलकांनी कुलूप लावले.

एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची एनपीपीची मागणी

मणिपूरमधील भाजपप्रणीत सरकारचा नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी पाठिंबा काढून घेतल्यानंतर तसेच राज्यातील वाढत्या हिंंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी मंत्री व एनडीएचे आमदार यांची सोमवारी संध्याकाळी एक बैठक बोलाविली. एन. बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी एनपीपीने केली आहे. 

महिला, मुलांच्या हत्येचा आरएसएसकडून निषेध

मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा रा. स्व. संघाने निषेध केला आहे. त्या राज्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही या संघटनेने केली आहे. रा. स्व. संघाने म्हटले आहे की, गेल्या १९ महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. निरपराध माणसांना त्यामुळे त्रास सोसावा लागत आहे. 

एनआयएने दाखल केले तीन एफआयआर

जिरिबाम येथे सशस्त्र दहशतवाद्यांनी एका महिलेची हत्या केली. जाकुराधोर करेंग आणि बोरोबेकरा पोलिस स्टेशन येथे सीआरपीएफ चौकीवर झालेला हल्ला, बोरोबेकरा येथे दहशतवाद्यांनी जाळलेली घरे व नागरिकांच्या केलेल्या हत्या या प्रकरणांत एनआयएने एफआयआर दाखल केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय