शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 07:29 IST

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले.

इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा वाढत असलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ५० अतिरिक्त कंपनी म्हणजे ५ हजारांहून अधिक जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जिरिबाम जिल्ह्यात मालमत्तेची नासधूस करणारा जमाव व जवानांची चकमक सुरू असताना गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. मणिपूरमधील विद्यमान स्थिती तसेच तेथे तैनात करण्यात आलेली सुरक्षा दले यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सलग दुसऱ्या दिवशी आढावा घेतला.

मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच रविवारी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या महिला व मुलांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलक बाबुपुरा येथे मालमत्तेची नासधूस करत असताना सुरक्षा दलाशी त्यांची चकमक झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. हा गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृताचे नाव के अथौबा असे असून, त्याचे वय २० वर्षांचे होते.

काँग्रेस आणि भाजपची कार्यालये व जिरिबामच्या अपक्ष आमदाराच्या घरांची रविवारी रात्री नासधूस करण्यात आली. जिरिबाम जिल्ह्यात १२ नोव्हेंबरला हिंसाचार घडल्यानंतर सीएपीएफच्या २०, सीआरपीएफच्या १५ व बीएसएफच्या ५ कंपन्या मणिपूरला रवाना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र वाढता हिंसाचार लक्षात घेता अतिरिक्त ५० कंपन्या तैनात करण्याचे ठरविले आहे. 

जिरिबाममध्ये निदर्शकांनी सरकारी कार्यालयांना लावले कुलूप 

जिरिबाममध्ये तीन महिला आणि तीन मुलांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ कोऑर्डीनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटीच्या (कोकोमी) सदस्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शकांनी संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून सोमवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मणिपूरमधील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट बुधवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिरिबाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या निषेधार्थ आंदोलक लम्फेलपत येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकुलात घुसले आणि त्यांनी तेथील मुख्य प्रवेशद्वार साखळ्या कुलूप लावून बंद केले. टाक्येल येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यालयाच्या तसेच आणखी एका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंदोलकांनी कुलूप लावले.

एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची एनपीपीची मागणी

मणिपूरमधील भाजपप्रणीत सरकारचा नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी पाठिंबा काढून घेतल्यानंतर तसेच राज्यातील वाढत्या हिंंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी मंत्री व एनडीएचे आमदार यांची सोमवारी संध्याकाळी एक बैठक बोलाविली. एन. बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी एनपीपीने केली आहे. 

महिला, मुलांच्या हत्येचा आरएसएसकडून निषेध

मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा रा. स्व. संघाने निषेध केला आहे. त्या राज्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही या संघटनेने केली आहे. रा. स्व. संघाने म्हटले आहे की, गेल्या १९ महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. निरपराध माणसांना त्यामुळे त्रास सोसावा लागत आहे. 

एनआयएने दाखल केले तीन एफआयआर

जिरिबाम येथे सशस्त्र दहशतवाद्यांनी एका महिलेची हत्या केली. जाकुराधोर करेंग आणि बोरोबेकरा पोलिस स्टेशन येथे सीआरपीएफ चौकीवर झालेला हल्ला, बोरोबेकरा येथे दहशतवाद्यांनी जाळलेली घरे व नागरिकांच्या केलेल्या हत्या या प्रकरणांत एनआयएने एफआयआर दाखल केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय