शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार; एकाच वेळी आजारी पडले सात जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:59 IST

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवाशांसह सात जण अचानक आजारी पडल्याची घटना घडली.

Air India Plane: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशातच लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात काही प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची प्रकृती अचानक बिघडली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांना त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना सोडून दिलं. या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रवाशांची तब्येत बिघडल्यानंतरही बोईंग ७७७ विमानाने आपला प्रवास सुरू ठेवला आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले.

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १३० विमानामध्ये प्रवासादरम्यान, पाच प्रवाशांनी आणि दोन क्रू मेंबर्सनी चक्कर येणे आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. एअर इंडियाने सोमवारी ही माहिती दिली. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले तेव्हा वैद्यकीय पथक आधीच तयार असल्याचे एअर इंडियाने सांगितले. मुंबईत पोहोचल्यानंतर, दोन प्रवाशांना आणि दोन क्रू मेंबर्सना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले जिथे त्यांची तपासणी करण्यात आली. नंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तपास यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

"विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आहे. आमच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना तात्काळ मदत केली. लँडिंगनंतरही २ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सना अस्वस्थ वाटत होते. त्यांना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत," असं एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी, एअर इंडिया एक्सप्रेसचे दिल्ली-जम्मू-श्रीनगर विमान जम्मू विमानतळावर न उतरताच दिल्लीला परतले. विमान सकाळी १०:४० वाजता निघणार होते. पण विमानाने सकाळी ११:०४ वाजता उड्डाण केले होते आणि दुपारी १२:०५ वाजता जम्मूला पोहोचणार होते. मात्र उड्डाणादरम्यान संशयास्पद जीपीएस समस्येमुळे विमान परत आणण्यात आले आणि दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूर ते दुबई या विमानात उड्डाण करण्यापूर्वी कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवरून पुन्हा विमानतळाकडे आणले. विमानात १३० प्रवासी होते. ५ तास विमान दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू राहिले. तरीही यश आले नाही. त्यानंतर, दुबईला जाणारे हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाLondonलंडन