शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
3
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
4
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
5
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
6
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
7
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
8
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
9
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
11
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
12
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
13
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
14
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
15
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
16
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
17
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
18
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
19
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
20
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार; एकाच वेळी आजारी पडले सात जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:59 IST

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवाशांसह सात जण अचानक आजारी पडल्याची घटना घडली.

Air India Plane: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशातच लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात काही प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची प्रकृती अचानक बिघडली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांना त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना सोडून दिलं. या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रवाशांची तब्येत बिघडल्यानंतरही बोईंग ७७७ विमानाने आपला प्रवास सुरू ठेवला आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले.

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १३० विमानामध्ये प्रवासादरम्यान, पाच प्रवाशांनी आणि दोन क्रू मेंबर्सनी चक्कर येणे आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. एअर इंडियाने सोमवारी ही माहिती दिली. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले तेव्हा वैद्यकीय पथक आधीच तयार असल्याचे एअर इंडियाने सांगितले. मुंबईत पोहोचल्यानंतर, दोन प्रवाशांना आणि दोन क्रू मेंबर्सना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले जिथे त्यांची तपासणी करण्यात आली. नंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तपास यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

"विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आहे. आमच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना तात्काळ मदत केली. लँडिंगनंतरही २ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सना अस्वस्थ वाटत होते. त्यांना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत," असं एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी, एअर इंडिया एक्सप्रेसचे दिल्ली-जम्मू-श्रीनगर विमान जम्मू विमानतळावर न उतरताच दिल्लीला परतले. विमान सकाळी १०:४० वाजता निघणार होते. पण विमानाने सकाळी ११:०४ वाजता उड्डाण केले होते आणि दुपारी १२:०५ वाजता जम्मूला पोहोचणार होते. मात्र उड्डाणादरम्यान संशयास्पद जीपीएस समस्येमुळे विमान परत आणण्यात आले आणि दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूर ते दुबई या विमानात उड्डाण करण्यापूर्वी कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवरून पुन्हा विमानतळाकडे आणले. विमानात १३० प्रवासी होते. ५ तास विमान दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू राहिले. तरीही यश आले नाही. त्यानंतर, दुबईला जाणारे हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाLondonलंडन