शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देशात पोलिसांच्या ५ लाख जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:40 IST

महाराष्ट्रात २६,१९५ : उत्तर प्रदेशात १.२९ लाख

नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलिसांच्या ५.२८ लाख रिक्त आहेत व त्यातील जवळपास १.२९ लाख जागा तर एकट्या उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये ५० हजार आणि पश्चिम बंगालमध्ये ४९ हजार जागा रिक्त आहेत. सगळ्या राज्यांत पोलिसांच्या २३ लाख ७९ हजार ७२८ जागा मंजूर असून, त्यातील १८ लाख ५१ हजार ३३२ जागा एक जानेवारी २०१८ रोजी भरलेल्या होत्या व याच तारखेला पाच लाख २८ हजार जागा रिक्त होत्या, असे गृह मंत्रालयाकडील आकडेवारीत म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या चार लाख १४ हजार ४९२ जागा मंजूर असून प्रत्यक्षात दोन लाख ८५ हजार ५४० जागाच भरलेल्या असून एक लाख २८ हजार ९५२ जागा रिक्त आहेत. बिहारमध्ये ७७ हजार ९९५ एवढे पोलीस कर्मचारी सेवेत असून तेथे मंजूर संख्या एक लाख २८ हजार २८६ आहे तर ५० हजार २९१ जागा रिक्त आहेत.पश्चिम बंगालमध्ये एक लाख ४० हजार ९०४ जागा मंजूर असून सेवेत फक्त ४८ हजार ९८१ कर्मचारीच आहेत. तेलंगणात ३० हजार ३४५ जागा रिक्त असून ७६ हजार ४०७ जागा मंजूर आहेत. नागालँड पोलीस दल देशात एकमेव दल असे आहे की २१ हजार २९२ जागा मंजूर असून ९४१ कर्मचारी जास्त आहेत.

मध्य प्रदेशात १ लाख १५ हजार ७३१ एवढे पोलीस बळ असून २२ हजार ३५५ जागा रिक्त आहेत. तमिळनाडूत पोलिसांच्या २२ हजार ४२० जागा रिक्त आहेत तर तेथे एक लाख २४ हजार १३० जागा मंजूर आहेत.कर्नाटकात पोलिसांच्या २१ हजार ९४३ जागा रिक्त असून मंजूर संख्या एक लाख २४३ एवढी आहे. गुजरातमध्ये २१ हजार ७० जागा रिक्त असून तेथे एक लाख ९ हजार ३३७ जागा मंजूर आहेत. झारखंडमध्ये १८ हजार ९३१२ जागा रिक्त असून मंजूर जागा ७९ हजार ९५० जागा मंजूर आहेत. १८ हजार तीन जागा राजस्थानात रिक्त असून मंजूर जागा एक लाख सहा हजार २३२ आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मंजूर जागा ७२ हजार १७६ असून १७ हजार ९३३ जागा रिक्त आहेत. हरियाणात १६ हजार ८४४ जागा रिक्त असून मंजूर जागा ६१ हजार ३४६ आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवायांनी त्रासलेल्या छत्तीसगडमध्ये ११ हजार ९१६ जागा रिक्त आहेत तर तेथे ७१ हजार ६०६ जागा मंजूर आहेत. ओदिशात १० हजार ३२२ जागा रिक्त असून ६६ हजार ९७३ जागा मंजूर आहेत. बंडखोरीने त्रस्त आसाममध्ये ११ हजार ४५२ जागा रिक्त असून मंजूर ६५ हजार ९८७ आहेत.सेवानिवृत्ती आणि अकाली मृत्यूमहाराष्ट्रात २६ हजार १९५ जागा रिक्त असून त्याची मंजूर कर्मचारी संख्या आहे दोन लाख ४० हजार २२४.एवढ्या मोठ्या संख्येत कर्मचारी जागा रिक्त असल्याची कारणे अधिकाऱ्यांनी भरतीची प्रक्रिया मंद असणे, सेवानिवृत्ती आणि अकाली मृत्यू सांगितली.जम्मू आणि काश्मीरमध्ये ८७ हजार ८८२ जागा मंजूर असून १० हजार ४४ जागा रिक्त आहेत.