शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

बेरोजगारीने गाठला ४५ वर्षांचा उच्चांक; अहवाल दडपल्याचा विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:48 IST

नोटाबंदी, जीएसटीचा फटका : दर तब्बल ६.१ टक्क्यांवर; सांख्यिकी आयोगाचीच आकडेवारी

नवी दिल्ली : देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक होता, अशी माहिती केंद्र सरकारी संघटनेच्या अहवालातूनच उघड झाली आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा कमी झाला, करदाते वाढले, महसुलात वाढ झाली, असा दावा केंद्र सरकार करीत असताना नोटाबंदीचा हा परिणामही समोर आला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील २0१७-१८ मधील बेरोजगारीचा दर तब्बल ६.१ टक्के इतका होता.राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने हा अहवाल निती आयोगाकडे आधीच सादर केला होता. पण निती आयोगाने त्या अहवालाकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सांख्यिकी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष व एक सदस्य यांनी पदाचे राजीनामे दिले होते. अर्थात निती आयोगाने वा सरकारने अद्यापही हा अहवाल जाहीर केलेला नाही. यावर अद्याप काम सुरू असल्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे.हा अहवाल अडचणीचा असल्यानेच तो दाबून ठेवल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली होती. तसेच आणखी एक संस्था मोदी सरकारने मारून टाकली आहे, असे ते म्हणाले होते.देशात १९७२-७३ या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. तेव्हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार असे सारेच रोजगाराच्या शोधात होते. त्यामुळे त्या वर्षांत बेरोजगारीचा दर ६ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर मात्र कधीही बेराजगारीचे प्रमाण इतके नव्हते.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात काय होता दर?यूपीए सरकारच्या काळात, म्हणजेच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २0११-१२ साली बेरोजगारीचा दर २.२ टक्के होता. तो २0१७-१८ मध्ये ६.१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, नोव्हेंबर २0१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली नोटाबंदी व त्यानंतर अमलात आलेली जीएसटी करप्रणाली यामुळे बेरोजगारी वाढली, असे दिसत आहे.अनेक अर्थतज्ज्ञ तसेच अभ्यासक बेरोजगारी वाढल्याचे सातत्याने सांगत आहेत. पण सरकार मात्र रोजगारांची संख्या वाढत असल्याचा दावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर सांख्यिकी आयोगाच्या अहवालातून नेमकी स्थिती स्पष्ट झाली आहे.‘मोदींनी देशासमोर संकट निर्माण केले’नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या दिशेने काहीच न करता बेरोजगारांसमोर मोठे संकट मात्र निर्माण केले, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, २०१७-१८ साली देशामध्ये ६.५ कोटी युवक बेरोजगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशावर अशी परिस्थिती आणणाऱ्या मोदींना पंतप्रधानपदावरून घालविण्याची वेळ आता आली आहे.

टॅग्स :jobनोकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार