शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

दलित अत्याचारांची ४५ हजार प्रकरणे; केंद्र सरकार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 3:48 AM

शिक्षांचे प्रमाण मात्र केवळ १0 टक्के

- संतोष ठाकुरनवी दिल्ली : मोदी सरकार आल्यापासून दलित-आदिवासींवरील अत्याचारांच्या प्रकरणांत वाढ झाल्याचे काँग्रेस व मायावती यांचे आरोप खरे दिसत आहेत. दरवर्षी देशात दलित व आदिवासींवरील ४५ हजार घटना घडतात, ही वस्तुस्थिती आहेत. त्यामुळेच रालोआ व केंद्रात मंत्री असलेले रामविलास पासवान यांनी या प्रश्नावर दलित खासदारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याने केंद्र सरकार अडचणीत आले आहे.त्यामुळेच दलित अत्याचार कायद्याख़ाली लगेचच विशेष न्यायालये स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. आतापर्यंत १४ राज्यांमध्ये अशी न्यायालये स्थापन झाली आहेत. तीन न्यायालये महाराष्ट्रात आहेत. मध्य प्रदेशात ४३, उत्तर प्रदेशात ४0 विशेष न्यायालये आहेत. छत्तीसगडमध्ये १७, गुजरातमध्ये १६ तर आंध्र प्रदेशात १४ न्यायालयने आहेत. पासवान यांना या प्रश्नाचे राजकारण करता येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ किती प्रकरणांत शिक्षा झाली हे महत्त्वाचे नसून, किती प्रकरणांत आरोपपत्रे दाखल झाली आहेत, हेही तपासायला हवे. किती जणांना अटक झाली, हे पाहायला हवे. अशा प्रकरणांत लोक साक्षीसाठी पुढे येत नाहीत, ही सर्वात चिंतेची बाब आहे. अर्थात समाजात बदल होत नाही, तोपर्यंत अशी प्रकरणे थांबतील, असे समजणे चुकीचे ठरेल.बदलाने मिळेल वरचा नंबरमहाराष्ट्रात २0१४ ते १६ या काळात आदिवासी अत्याचारांची ४४३, ४८२ व ४0३ प्रकरणे नोंदवली गेली. पहिल्या वर्षी १२, दुसºया वर्षी २५ व तिसºया वर्षी २५ प्रकरणांत आरोपींना शिक्षा झाली. दलित अत्याचारांची याच काळात १७६८, १८0४ व १७५0 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी या तीन वर्षांत अनुक्रमे ५९, ६४ व १0६ प्रकरणांत संबंधितांना शिक्षा झाली.केंद्र सरकारने संसदेमध्ये सांगितले की २0१४ ते २0१६ या काळात देशात दरवर्षी सुमारे ४0 हजार दलित अत्याचाराची प्रकरणे पुढे आली आहेत. अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी अत्याचारांची प्रकरणे दरवर्षी ६ हजारांच्या आसपास आहेत. मात्र शिक्षेचे प्रमाण केवळ १0 टक्केच आहे.

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार